शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

केंद्र व राज्य शासनाकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: December 28, 2015 00:19 IST

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़ त्यांनी कोणतीही आश्वासने पाळली नाहीत़ ही जनतेची दिशाभूल आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़ महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या २१ व्या राज्य अधिवेशनाला रविवारी अहमदपुरातील चामे गार्डन येथे प्रारंभ झाला़ या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान होते़ यावेळी माजीमंत्री बाळासाहेब जाधव, माजी आ़बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब पाटील टाकळगावकर, निवृत्ती कांबळे, सिराजोद्दीन जहागिरदार, अ‍ॅड़ भगवानराव पौळ, माजी सभापती गुरुडे, ओमकार पाटील, बाबुराव कानगुले यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी आहेत़ पण ते सरकारवर टीका करतात़ भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नसल्याचे ते सांगतात़ सरकारने काहीच केले नाही, असे त्यांचे मत असेल तर ते आपल्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास का सांगत नाहीत, असा सवालही अ‍ॅड़ आंबेडकर यांनी केला़ भाजप व सेनेची मिलीभगत असून, ते एकमेकांवर आरोप करुन जनतेला फसवत आहेत़ उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा खरच कळवळा असेल तर आणि भाजपचे सरकार काही करत नसेल तर ते सरकारमधून का बाहेर पडत नाहीत, असेही अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले़ प्रास्ताविक कॉ़महादेव गावंडे यांनी केले़ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचेही समयोचित भाषण झाले़ सुत्रसंचालन गुणाले यांनी तर आभार राजीव पाटील यांनी मानले़ परिषदेला शेतकरी उपस्थित होते़