शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

केंद्र व राज्य शासनाकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: December 28, 2015 00:19 IST

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़ त्यांनी कोणतीही आश्वासने पाळली नाहीत़ ही जनतेची दिशाभूल आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़ महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या २१ व्या राज्य अधिवेशनाला रविवारी अहमदपुरातील चामे गार्डन येथे प्रारंभ झाला़ या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान होते़ यावेळी माजीमंत्री बाळासाहेब जाधव, माजी आ़बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब पाटील टाकळगावकर, निवृत्ती कांबळे, सिराजोद्दीन जहागिरदार, अ‍ॅड़ भगवानराव पौळ, माजी सभापती गुरुडे, ओमकार पाटील, बाबुराव कानगुले यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी आहेत़ पण ते सरकारवर टीका करतात़ भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नसल्याचे ते सांगतात़ सरकारने काहीच केले नाही, असे त्यांचे मत असेल तर ते आपल्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास का सांगत नाहीत, असा सवालही अ‍ॅड़ आंबेडकर यांनी केला़ भाजप व सेनेची मिलीभगत असून, ते एकमेकांवर आरोप करुन जनतेला फसवत आहेत़ उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा खरच कळवळा असेल तर आणि भाजपचे सरकार काही करत नसेल तर ते सरकारमधून का बाहेर पडत नाहीत, असेही अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले़ प्रास्ताविक कॉ़महादेव गावंडे यांनी केले़ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचेही समयोचित भाषण झाले़ सुत्रसंचालन गुणाले यांनी तर आभार राजीव पाटील यांनी मानले़ परिषदेला शेतकरी उपस्थित होते़