शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

कवितेतून उमटल्या गरिबीच्या व्यथा, उपेक्षितांच्या कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:19 IST

औरंगाबाद : ‘फडताळात ठेवलेलं बेलणं पाहिलं की आजही उडतो थरकाप.. माय जेव्हा पोळ्या लाटायची, घर पीठ सारे काही दुसऱ्याचं, ...

ठळक मुद्देनिमंत्रितांचे कविसंमेलन : शताब्दी काव्य मंडळ आयोजित कविसंमेलन उत्साहात

औरंगाबाद : ‘फडताळात ठेवलेलं बेलणं पाहिलं की आजही उडतो थरकाप.. माय जेव्हा पोळ्या लाटायची, घर पीठ सारे काही दुसऱ्याचं, पण भूक मात्र माझी असायची..’ ही गरिबीच्या आठवणी सांगणारी कविता कवी गिरीश जोशी यांनी सादर केली आणि उपस्थित सारीच रसिक मंडळी भावविवश होऊन हळहळली. कुठे गरिबीच्या व्यथा, तर कुठे वंचित, उपेक्षितपणाची बोचरी धार कवितेच्या माध्यमातून निघून रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडत होती.शताब्दी काव्यमंडळातर्फे शनिवारी सायंकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवियित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. कवयित्री संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, तसेच कवी श्रीकांत देशमुख यांची कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थिती होती.संमेलनादरम्यान काही कवींनी विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा, तर काही कवींनी विनोदी माध्यमातून वर्तमानावर भाष्य करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. बालाजी सुतार, प्रभाकर शेळके, श्रीराम पोतदार, आत्माराम जाधव, अनिल साबळे, डॉ. राज रणधीर, पंजाबराव मोरे, लक्ष्मण खेडकर, गिरीश जोशी, उमेश इंगळे निमंत्रित कवी या काव्यसंमेलनात सहभागी झाले होते.सूत्रे कोणाच्याही हातात असली तरी वंचितांची दु:खे काही कमी होत नाहीत, या विषयावर भाष्य करणारी ‘आता विश्वास राहिला नाही’ ही कविता उमेश इंगळे यांनी सादर केली. त्यांच्या कवितेतील ‘अजूनही जमत नाही त्यांना दुर्बलांचा आधार व्हायला...’ या ओळी उपस्थितांची वाहवा मिळविणाºया ठरल्या. कोपर्डीसारख्या घटनांमधून महिलांवर होणाºया अत्याचाराविषयी भाष्य करणारी ‘येता गोंडस गोजिरं कुण्या हरिणीचं पाडस’ या आशयाची प्रभाकर शेळके यांची कविता उपस्थितांना अंतर्मुख करणारी होती. प्रत्येक कवीच्या कवितेतून त्याचे जागृत असणारे सामाजिक भान, चपखल निरीक्षणशक्ती स्पष्टपणे उमटत होती. उपस्थितांनाही विचार करण्यास भाग पाडणाºया या कविता रसिकांची मने जिंकणाºया ठरल्या.दरम्यान, सुरुवातीला भाष्य करताना अनुराधा पाटील म्हणाल्या की, आज कवींच्या बाबतीत सर्वत्र अपेक्षाभंग, अनास्था असून, नव्याने उमलू पाहणाऱ्यांसाठी ही गोष्ट निराशाजनक आहे. आज माध्यमे ही कवींसाठी विनाशकारी ठरत आहेत. चार ओळी खरडून सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहवा मिळवणे कवींसाठी अहितकारक आहे. शिकण्याचा, वाचण्याचा अभाव कवींना उथळ बनवत चालला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर चांगल्या गोष्टी नियमित करणे हे कवीचे सांस्कृतिक कर्तव्य आहे. प्रत्येक कालखंडातील कवींना त्रास झाला असून, वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केल्यास नकाराला सामोरे जावे लागले असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य