शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कवितेतून उमटल्या गरिबीच्या व्यथा, उपेक्षितांच्या कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:19 IST

औरंगाबाद : ‘फडताळात ठेवलेलं बेलणं पाहिलं की आजही उडतो थरकाप.. माय जेव्हा पोळ्या लाटायची, घर पीठ सारे काही दुसऱ्याचं, ...

ठळक मुद्देनिमंत्रितांचे कविसंमेलन : शताब्दी काव्य मंडळ आयोजित कविसंमेलन उत्साहात

औरंगाबाद : ‘फडताळात ठेवलेलं बेलणं पाहिलं की आजही उडतो थरकाप.. माय जेव्हा पोळ्या लाटायची, घर पीठ सारे काही दुसऱ्याचं, पण भूक मात्र माझी असायची..’ ही गरिबीच्या आठवणी सांगणारी कविता कवी गिरीश जोशी यांनी सादर केली आणि उपस्थित सारीच रसिक मंडळी भावविवश होऊन हळहळली. कुठे गरिबीच्या व्यथा, तर कुठे वंचित, उपेक्षितपणाची बोचरी धार कवितेच्या माध्यमातून निघून रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडत होती.शताब्दी काव्यमंडळातर्फे शनिवारी सायंकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवियित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. कवयित्री संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, तसेच कवी श्रीकांत देशमुख यांची कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थिती होती.संमेलनादरम्यान काही कवींनी विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा, तर काही कवींनी विनोदी माध्यमातून वर्तमानावर भाष्य करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. बालाजी सुतार, प्रभाकर शेळके, श्रीराम पोतदार, आत्माराम जाधव, अनिल साबळे, डॉ. राज रणधीर, पंजाबराव मोरे, लक्ष्मण खेडकर, गिरीश जोशी, उमेश इंगळे निमंत्रित कवी या काव्यसंमेलनात सहभागी झाले होते.सूत्रे कोणाच्याही हातात असली तरी वंचितांची दु:खे काही कमी होत नाहीत, या विषयावर भाष्य करणारी ‘आता विश्वास राहिला नाही’ ही कविता उमेश इंगळे यांनी सादर केली. त्यांच्या कवितेतील ‘अजूनही जमत नाही त्यांना दुर्बलांचा आधार व्हायला...’ या ओळी उपस्थितांची वाहवा मिळविणाºया ठरल्या. कोपर्डीसारख्या घटनांमधून महिलांवर होणाºया अत्याचाराविषयी भाष्य करणारी ‘येता गोंडस गोजिरं कुण्या हरिणीचं पाडस’ या आशयाची प्रभाकर शेळके यांची कविता उपस्थितांना अंतर्मुख करणारी होती. प्रत्येक कवीच्या कवितेतून त्याचे जागृत असणारे सामाजिक भान, चपखल निरीक्षणशक्ती स्पष्टपणे उमटत होती. उपस्थितांनाही विचार करण्यास भाग पाडणाºया या कविता रसिकांची मने जिंकणाºया ठरल्या.दरम्यान, सुरुवातीला भाष्य करताना अनुराधा पाटील म्हणाल्या की, आज कवींच्या बाबतीत सर्वत्र अपेक्षाभंग, अनास्था असून, नव्याने उमलू पाहणाऱ्यांसाठी ही गोष्ट निराशाजनक आहे. आज माध्यमे ही कवींसाठी विनाशकारी ठरत आहेत. चार ओळी खरडून सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहवा मिळवणे कवींसाठी अहितकारक आहे. शिकण्याचा, वाचण्याचा अभाव कवींना उथळ बनवत चालला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर चांगल्या गोष्टी नियमित करणे हे कवीचे सांस्कृतिक कर्तव्य आहे. प्रत्येक कालखंडातील कवींना त्रास झाला असून, वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केल्यास नकाराला सामोरे जावे लागले असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य