शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठवाड्यातून चौघांनाच मंत्रीपदाची लॉटरी; निलंगेकर, लोणीकर, शिरसाट ‘वेट ॲण्ड वॉच’वर

By नंदकिशोर पाटील | Updated: August 10, 2022 17:40 IST

मराठवाड्यात २६ सत्ताधारी आमदार, सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित 

औरंगाबाद: राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन प्रतिनिधित्व मिळाले असून उर्वरित सहा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार पुढील विस्तारात संधी मिळेल या आशेवर आहेत. या प्रदेशात भाजपचे सोळा तर शिंदे समर्थक आमदारांची संख्या दहा आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि तानाजी सावंत या चौघांची वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर दुसरीकडे भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील सत्तांतरात मराठवाड्यातील आमदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या मंत्र्यांसह दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात सामील झाले. पैकी भुमरे आणि सत्तार यांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळाली आहे. संजय शिरसाट यांचा पत्ता ऐनवेळी कसा कटला, या बद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिरसाट यांना कदाचित विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळू शकते.

मराठवाड्यात भाजपचे सोळा आमदार आहेत. पैकी एकमेव अतुल सावे (औरंगाबाद) यांना संधी मिळाली आहे. माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांना कदाचित पुढील विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातून निलंगेकर की अभिमन्यू पवार, असाही भाजपपुढे पेच आहे. कारण दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत (परंडा) यांची वर्णी लागल्याने या जिल्ह्याचा खूप दिवसांचा अनुशेष भरुन निघाला आहे. तर लातूरसह नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि बीड हे सहा जिल्हे मंत्री पदापासून वंचित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर होते. त्यामुळे आ. बालाजी कल्याणकर व आ. संतोष बांगर यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

‘मविआ’त होते सात मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय बनसोडे असे सात जण मंत्री होते.

औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी !मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी लागली आहे. शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून सावे यांची वर्णी लागली असण्याची शक्यता आहे.

सत्तारांनी मारजी बाजीटीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने त्यांचे मंत्रिपद हुकणार, अशी चर्चा वृत्त वाहिन्यांवर सुरू होती. मात्र, सत्तारांनी मंत्रिपद मिळवून अनेकांना धक्का दिला. सत्तार हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. मंत्रिपद सोडून ते शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सिल्लोड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याची बक्षिसी सत्तार यांना मिळाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारSanjay Shirsatसंजय शिरसाटsambhaji nilangekarसंभाजी निलंगेकरBabanrao Looneykarबबनराव लोणीकर