शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

खंडित वीजपुरवठ्यामुळे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:00 IST

औद्योगिक शहर’ अशी बिरुदावली मिरवणा-या औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये तासन्तास वीज गुल होत असल्यामुळे उद्योजक हैराण झाले असून, दिवसाला १२ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘औद्योगिक शहर’ अशी बिरुदावली मिरवणा-या औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये तासन्तास वीज गुल होत असल्यामुळे उद्योजक हैराण झाले असून, दिवसाला १२ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. नियमित वीजबिले भरूनही नियमित वीज मिळत नसल्यामुळे उद्योजक संताप व्यक्त करीत आहेत.ऐन दिवाळी सणाच्या काळात चिकलठाणा एमआयडीसीतील सुमारे ४५० लघु व मध्यम उद्योगांची वीज खंडित होत असल्यामुळे उत्पादन प्रक्रिया वारंवार बंद करावी लागते. फिडर-२ वरून होणारा पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येतो. त्यामुळे तास-दीडतास उत्पादन थांबवावे लागते. त्यामुळे उद्योजकांचे प्रतिदिन दहा ते बारा कोटी रुपयांपर्यंत नुकसान होते, असे ‘मसिआ’चे प्रसिद्धीप्रमुख मनीष अग्रवाल यांनी सांगितले.पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या एमआयडीसीमध्ये महावितरणच्या बेभरवशी कारभारामुळे उद्योजकांच्या अडचणींमध्ये भर घातली आहे. गुरुवारी सिडको सर्व्हिस इंडस्ट्रीयल भागात पावणेदोन तास तर सायंकाळी एमआयडीसीत वीज गुल होती. ‘तीन दशकांहून अधिक जुनी यंत्रणा बदलण्यात न आल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही प्रामाणिकपणे बिले भरूनही वीज मिळत नसेल तर कोणाकडे दाद मागायची, असा सवाल उद्योजक विचारत आहेत.