शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

दूध संकलन आले अर्ध्यावर!

By admin | Updated: May 8, 2016 23:31 IST

जालना : कोरडेठाक पडलेले जलसाठे व अत्यल्प चाऱ्यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच अनेकांनी जनावरांची विक्री केल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम होत आहे

जालना : कोरडेठाक पडलेले जलसाठे व अत्यल्प चाऱ्यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच अनेकांनी जनावरांची विक्री केल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम होत आहे. दिवसाकाठी जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार लिटर दूध संकलन होते. हे प्रमाण एक ते दीड हजारांवर आले आहे. विशेष म्हणजे दूध पुड्यांचीही आवक कमी होत आहे. गत काही वर्षांत गायी, म्हशींची संख्या रोडावली आहे. यामुळे दुग्ध उत्पादनावरही परिणाम झाला. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यांत अत्यल्प साठा झाला मात्र चारा उत्पादनही झाले नाही. खरीप व रबी हंगामातूनही चाऱ्याचे उत्पादन झाले नाही. ९ लाख जनावरांसाठी १० ते १२ लाख टन चाऱ्याची गरज आहे. मात्र अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचे उत्पादनाही मोठी घट आली आहे. ज्वारीचा चाराही जेमतेम निघाला. सर्वसाधारण जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन सुमारे अडीच लाख लिटर एवढी असल्याचे सांगण्यात येते. हॉटेल, घरगुती वापरसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. बहुतांश दुध उत्पादक शासनाऐवजी खाजगी संस्थांकडे दुधाची विक्री करीत असल्याने शासनाचे दूध संकलन कमी होत आहे. काही वर्षांपासून दुष्काळ जिल्ह्याची पाठ सोडत नसल्याने शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहे. दुष्काळामुळे पाणी व चाऱ्याची सोय होत नसल्याने पशुपालक जनावरांची विक्री करीत आहेत. आठवडी बाजारात जनावर विक्री वाढली आहे. जनावरांना पोषक आहार मिळणेही जिकिरीचे झाले आहे. अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर येथून खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात जिल्हाला दूधाचा पुरवठा करतात. जिल्ह्यात ९ लाख ३५ हजार एवढे पशुधन असल्याची नोंद आहे. त्यात बैल व गायी मिळून ४ लाख ५७ हजार, म्हशी ८६ हजार, मेंढी ५१ हजार, शेळी २ लाख ८७ हजार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)