शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

दूध संकलन आले अर्ध्यावर!

By admin | Updated: May 8, 2016 23:31 IST

जालना : कोरडेठाक पडलेले जलसाठे व अत्यल्प चाऱ्यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच अनेकांनी जनावरांची विक्री केल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम होत आहे

जालना : कोरडेठाक पडलेले जलसाठे व अत्यल्प चाऱ्यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच अनेकांनी जनावरांची विक्री केल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम होत आहे. दिवसाकाठी जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार लिटर दूध संकलन होते. हे प्रमाण एक ते दीड हजारांवर आले आहे. विशेष म्हणजे दूध पुड्यांचीही आवक कमी होत आहे. गत काही वर्षांत गायी, म्हशींची संख्या रोडावली आहे. यामुळे दुग्ध उत्पादनावरही परिणाम झाला. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यांत अत्यल्प साठा झाला मात्र चारा उत्पादनही झाले नाही. खरीप व रबी हंगामातूनही चाऱ्याचे उत्पादन झाले नाही. ९ लाख जनावरांसाठी १० ते १२ लाख टन चाऱ्याची गरज आहे. मात्र अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचे उत्पादनाही मोठी घट आली आहे. ज्वारीचा चाराही जेमतेम निघाला. सर्वसाधारण जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन सुमारे अडीच लाख लिटर एवढी असल्याचे सांगण्यात येते. हॉटेल, घरगुती वापरसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. बहुतांश दुध उत्पादक शासनाऐवजी खाजगी संस्थांकडे दुधाची विक्री करीत असल्याने शासनाचे दूध संकलन कमी होत आहे. काही वर्षांपासून दुष्काळ जिल्ह्याची पाठ सोडत नसल्याने शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहे. दुष्काळामुळे पाणी व चाऱ्याची सोय होत नसल्याने पशुपालक जनावरांची विक्री करीत आहेत. आठवडी बाजारात जनावर विक्री वाढली आहे. जनावरांना पोषक आहार मिळणेही जिकिरीचे झाले आहे. अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर येथून खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात जिल्हाला दूधाचा पुरवठा करतात. जिल्ह्यात ९ लाख ३५ हजार एवढे पशुधन असल्याची नोंद आहे. त्यात बैल व गायी मिळून ४ लाख ५७ हजार, म्हशी ८६ हजार, मेंढी ५१ हजार, शेळी २ लाख ८७ हजार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)