शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीतील कस्तुरबा गांधी विद्यालयाचे स्थलांतर पाणीपुरवठ्याअभावी रखडले

By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST

बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे.

बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे. दीडशे मुलींसाठीची इमारत तयार असून पाणीपुरवठ्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. अर्धवट शाळा सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून शासनाने सात वर्षांपूर्वी बिलोली तालुका पातळीवर कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाचे निर्माण केले होते. प्रारंभी सेवाभावी संस्थाकडून विविध प्रस्ताव मागविण्यात आले. पात्रतेनुसार संबंधित संस्थांना अशा शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र बिलोलीसाठी मंज़ूर शाळा खतगावकर आणि एंबडवार यांच्या उच्चन्यायालयीन लढाईनंतर संस्थेऐवजी स्थानिक शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली. तहसीलदार अध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी पदसिद्ध सचिव म्हणून नेमण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत वर्गही सुरु झाले. शाळा गांधीनगरच्या परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. शाळेसाठी स्वतंत्र मालकीच्या इमारतीसाठी अनुदान मंजूर झाले. इमारतीसाठी उंच टेकडीवर मोकळी जागा देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला. प्रारंभी बांधकामासाठी पाणी नसल्याने ठेकेदाराने रडत- रडत काम केले. अर्धवट सोडून नंतर तो निघून गेला. दोन वर्षांनंतर दुसऱ्या ठेकेदाराडून इमारतीचे काम करुन घेण्यात आले. टँकरद्वारे पाणी आणून काम पूर्ण झाले. संपूर्ण मुलींसाठी शिकवणी खोल्या, कार्यालय, स्वयंपाक घर, स्वच्छतागृह, वसतिगृह, प्रयोगशाळा, हॉल आदींचे काम पूर्ण झाले. भाड्याच्या इमारतीमधील शाळा रिकामी करुन जून १४ च्या शैक्षणिक वर्षांपासून नूतन इमारतीमध्ये शाळा स्थलांतरीत करावी, असे आदेश नांदेड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. मात्र पाण्याअभावी शाळा कशी स्थलांतरीत करावी, ही समस्या उभी राहिल्याने स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. सुरक्षा रक्षकाची आवश्यकतासद्यस्थिीतील भाड्याची इमारत व शाळा गांधीनगरच्या मध्यवस्तीत आहे. शेजारी इमारत आणि उचभ्रू वस्ती आहे. त्यामुळे येथे भितीचे वातावरण नाही, पण नूतन इमारत उंच टेकडीवर असून पाठीमागे वनखात्याची जमीन आहे. येथे दिवसादेखील निर्मणुष्य परिस्थिती असते. अद्याप तरी कस्तुरबा विद्यालयाकडे कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती झालेली नाही. मुलींना शिकविणाऱ्या सर्वच महिला शिक्षिका आहे, अशा स्थितीत कोणती घटना होईल. हे सांगता येत नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येथे बंदूकधारी सुरक्षा रक्षकाची गरज आहे, असे मुख्याध्यापिका जी. आर. सावळे यांनी सांगितले. बिलोली पालिका पाणी पुरवठा करेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाडून आल्यानंतरच येथे इमारत पूर्ण करण्यात आली. सध्या पाण्याची सोय न झाल्यानेच स्थलांतर थांबले आहे. संपूर्ण मूलभूत सुविधा पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतरच निवासी शाळा हलविण्यात येईल- माधव सलगर, गटशिक्षणाधिकारी तथा सचिवबिलोली शहरवासीयांनाच मागील दोन वर्षांपासून एक- दिवस आड व एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे. बिलोलीच्या जलकुंभातून पाणी देणे शक्यच नाही. शाळा प्रशासनाने स्वतंत्र उपायायोजना हाती घ्यावी. त्यात उंच टेकडीवर पाणीपुरवठा कसे शक्य आहे- भीमराव जेठे, नगरसेवक, माजी नगराध्यक्षकोणत्याही अप्रिय घटना नाकारता येत नाहीत. राज्यासह देशात महिला अत्याचाराबाबतच्या घटना आपण दररोज पाहत आहोत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ तास रक्षकाची कायम नियुक्ती करावी- जमनाबाई खंडेराय, नगराध्यक्षा, बिलोली