शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

एमजीएम ते लक्ष्मण चावडी रस्ता २४ मीटर रुंद, घरे पाडण्याच्या नोटीसने कैलासनगरवासीयांची उडाली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 19:10 IST

एमजीएम ते लक्ष्मण चावडीपर्यंत रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

औरंगाबाद : कैलासनगर स्मशानभूमी रोडवरील घरे रस्त्यावरील अतिक्रमण ठरवून ती पाडण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. २०११ मध्ये महापालिकेने १८ मीटर रस्ता रुंद करण्यासाठी अनेक घरे पाडली. आता हा रस्ता २४ मीटर रुंद असल्याच्या नोटिसा दिल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले.

एमजीएम ते लक्ष्मण चावडीपर्यंत रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे काम सुरू आहे. रस्त्यातील काही मालमत्ता रुंदीकरणात जात आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत. शहर विकास आराखड्यानुसार रस्ता कुठे १८ मीटर, तर काही भागात २४ मीटर रुंद आहे. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती, तेव्हा कैलासनगरातील रस्ता रुंद करण्यात आला होता. अनेक नागरिकांची घरे पाडण्यात आली होती. महापालिकेने याचा मोबदलाही टीडीआर स्वरूपात दिला. आता महापालिकेने येथील ५० पेक्षा अधिक नागरिकांना महापालिका अधिनियम कलम २६० अन्वये नोटिसा दिल्या. या नोटीसमध्ये रस्ता २४ मीटर रुंद असल्याचे म्हटले आहे. आपल्या मालमत्ता का पाडण्यात येऊ नये, असे त्यात म्हटले आहे. यासंदर्भात आपले म्हणणे ८ ते १५ दिवसांत महापालिकेकडे दाखल करावे असे अतिक्रमण हटाव विभागाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नोटिसा प्राप्त होताच परिसरात खळबळ उडाली. नऊ वर्षांपूर्वीच आमच्या मालमत्तांचा काही भाग महापालिकेने रुंदीकरणात घेतला. आता पुन्हा आम्हाला बेघर करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. महापालिकेने पूर्वी रस्ता रुंद करताना १८ मीटरनुसार पाडापाडी केली होती. आता २४ मीटर म्हटले तर अनेकांची पूर्ण घरेच यामध्ये जाणार आहेत.

मनपाने मोजणी करावी२०११ मध्ये मार्किंग करून रस्ता रुंदीकरण केले. नागरिकांनी मनपा प्रशासनाला तेव्हा सहकार्य केले. आता पुन्हा आचनक २४ मीटर रस्ता असल्याचे सांगून नोटीस दिल्याने आमची झोप उडाली आहे. आधीच कोरोनाने अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय ठप्प झाला. आता राहते घरही जाणार ही भीती भेडसावत आहे. प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरू नये.- बिपीन जावळे, नागरिक.

१८ आणि २४ मीटरचा वाद संपवाकैलासनगरातील गोरगरीब नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. मनपाने या भागात रस्ता नेमका १८ मीटर आहे का २४ मीटर हे निश्चित करावे. विनाकारण त्रास देऊ नये. यापूर्वी मनपाने अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर केले. आता पुन्हा करू नये.भास्कर गिऱ्हे, नागरिक

मोजणी झालेली आहेरस्ता १८ मीटरपर्यंत कुठे आहे, पुढे २४ मीटर कुठे आहे, हे नगररचना विभागाने अलीकडेच मोजणी करून मार्किंगही केली आहे. अनेक नागरिकांनी मनपाला जागा हस्तांतरित केल्यावर पुन्हा अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने नोटिसा दिल्या. विनाकारण त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही.- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका