शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

वाहतूक खर्चावरून गोंधळ

By admin | Updated: March 3, 2017 01:34 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन आदेशान्वये नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेले बाजार समितीतील तूर खरेदी केंद्र मागील आठवड्यापासून बंद पडले आहे़

उस्मानाबाद : शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन आदेशान्वये नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेले बाजार समितीतील तूर खरेदी केंद्र मागील आठवड्यापासून बंद पडले आहे़ तूर खरेदीकेंद्र बंद पडल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, अनेकांचा माल केंद्राच्या बाहेर वाहनांमध्ये पडून आहे़ तर नाफेडकडून ५० किलोमीटरच्या पुढील वाहतुकीचा खर्च मिळत नसल्याने खरेदी-विक्री संघाचीही अडचण झाल्याचे सांगितले जात आहे़तीन-चार वर्षाच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या पदरी यंदा शेतमाल काही प्रमाणात पडत आहे़ ऐन दुष्काळात आभाळाला भिडलेले तुरीचे दर उत्पादन वाढल्यानंतर मात्र, घसरले आहेत़ शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली़ उस्मानाबाद येथील बाजार समितीच्या आवारातही तूर खरेदी केंद्र मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे उस्मानाबाद तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता़ आजवर या केंद्रावर जवळपास १७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़ व्यापाऱ्यांकडून तुरीला कमी भाव मिळत असल्याने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रातून ५०५० रूपये हमी भावाने तुरीची खरेदी करण्यात आली़ व्यापाऱ्यांपेक्षा तूर खरेदी केंद्रावर चांगला दर मिळू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी येथे माल आणून घालण्यास सुरूवात केली़ मात्र, मागील आठवड्यापासून बारदाना नसल्याचे कारण पुढे करीत तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे़ या केंद्राने घेतलेल्या मालाद्वारे जवळपास तीन गोडाऊन फुल्ल झाले असून, आता येणारा माल ठेवायचा कोठे ? आणि नाफेडकडून ५० किलोमीटरच्या पुढील खर्च मिळत नसल्याने माल पुढे द्यायचा कसा हा प्रश्न खरेदी-विक्री संघासमोर उभा आहे़ नाफेडच्या अधिकाऱ्यांकडूनही याबाबत तोडगा काढला जात नसल्याचे सांगण्यात आले़ असे असले तरी प्रशासनाच्या गोंधळात शेतकऱ्यांची मात्र, गैरसोय होत असून, संबंधितांनी लक्ष देऊन तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)