शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

वाहतूक खर्चावरून गोंधळ

By admin | Updated: March 3, 2017 01:34 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन आदेशान्वये नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेले बाजार समितीतील तूर खरेदी केंद्र मागील आठवड्यापासून बंद पडले आहे़

उस्मानाबाद : शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन आदेशान्वये नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेले बाजार समितीतील तूर खरेदी केंद्र मागील आठवड्यापासून बंद पडले आहे़ तूर खरेदीकेंद्र बंद पडल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, अनेकांचा माल केंद्राच्या बाहेर वाहनांमध्ये पडून आहे़ तर नाफेडकडून ५० किलोमीटरच्या पुढील वाहतुकीचा खर्च मिळत नसल्याने खरेदी-विक्री संघाचीही अडचण झाल्याचे सांगितले जात आहे़तीन-चार वर्षाच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या पदरी यंदा शेतमाल काही प्रमाणात पडत आहे़ ऐन दुष्काळात आभाळाला भिडलेले तुरीचे दर उत्पादन वाढल्यानंतर मात्र, घसरले आहेत़ शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली़ उस्मानाबाद येथील बाजार समितीच्या आवारातही तूर खरेदी केंद्र मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे उस्मानाबाद तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता़ आजवर या केंद्रावर जवळपास १७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़ व्यापाऱ्यांकडून तुरीला कमी भाव मिळत असल्याने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रातून ५०५० रूपये हमी भावाने तुरीची खरेदी करण्यात आली़ व्यापाऱ्यांपेक्षा तूर खरेदी केंद्रावर चांगला दर मिळू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी येथे माल आणून घालण्यास सुरूवात केली़ मात्र, मागील आठवड्यापासून बारदाना नसल्याचे कारण पुढे करीत तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे़ या केंद्राने घेतलेल्या मालाद्वारे जवळपास तीन गोडाऊन फुल्ल झाले असून, आता येणारा माल ठेवायचा कोठे ? आणि नाफेडकडून ५० किलोमीटरच्या पुढील खर्च मिळत नसल्याने माल पुढे द्यायचा कसा हा प्रश्न खरेदी-विक्री संघासमोर उभा आहे़ नाफेडच्या अधिकाऱ्यांकडूनही याबाबत तोडगा काढला जात नसल्याचे सांगण्यात आले़ असे असले तरी प्रशासनाच्या गोंधळात शेतकऱ्यांची मात्र, गैरसोय होत असून, संबंधितांनी लक्ष देऊन तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)