शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

प्राधिकरण यंत्रणा शासनात विलिन करा

By admin | Updated: December 8, 2015 00:04 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यंत्रणा शासनात विलिन करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सुरू केलेल्या

उस्मानाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यंत्रणा शासनात विलिन करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून येथेही कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सामुदायिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.मुळात जीवन प्राधीकरण हे शासानाचे पाणीपुरवठा खाते होते. शासनाच्या सोईसाठी मंडळ-विभाग स्थापन करून या पाणीपुरवठा खात्यास मंडळ/विभागात रूपांतरित केले आहे. त्यावेळी मंडळास सर्व शासनाचे नियम व अटी तसेच फायदे मिळतील असे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून प्राधिकरणाची कामे शासनानेच अन्यत्र वर्ग केल्यामुळे व ईटीपी चार्जेस १७.५ टक्के वरून पाच टक्क्यांपर्यंत आणल्यामुळे प्राधिकरण आर्थिक संकटात सापडले. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, आश्वासित प्रगती योजना यासारख्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच त्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणा शासनात विलीन करावी, यासाठी नोंदणीकृत पंधरा संघटनांनी एकत्रित येवून संयुक्त संघटना संघर्ष कृती समिती स्थापन केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली २४ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४ डिसेंबर रोजी सामुदायिक रजा आंदोलन तर सोमवारी धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. एस. ढवळे, उपकार्यकारी अभियंता राजकुमार पांडव, बी. एन. तांबोळी, आर. बी. सूर्यवंशी, एस. आर. पडवळ, पी. आर. भोई, आर. जे. राजूरकर आदी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)