शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरण यंत्रणा शासनात विलिन करा

By admin | Updated: December 8, 2015 00:04 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यंत्रणा शासनात विलिन करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सुरू केलेल्या

उस्मानाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यंत्रणा शासनात विलिन करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून येथेही कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सामुदायिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.मुळात जीवन प्राधीकरण हे शासानाचे पाणीपुरवठा खाते होते. शासनाच्या सोईसाठी मंडळ-विभाग स्थापन करून या पाणीपुरवठा खात्यास मंडळ/विभागात रूपांतरित केले आहे. त्यावेळी मंडळास सर्व शासनाचे नियम व अटी तसेच फायदे मिळतील असे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून प्राधिकरणाची कामे शासनानेच अन्यत्र वर्ग केल्यामुळे व ईटीपी चार्जेस १७.५ टक्के वरून पाच टक्क्यांपर्यंत आणल्यामुळे प्राधिकरण आर्थिक संकटात सापडले. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, आश्वासित प्रगती योजना यासारख्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच त्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणा शासनात विलीन करावी, यासाठी नोंदणीकृत पंधरा संघटनांनी एकत्रित येवून संयुक्त संघटना संघर्ष कृती समिती स्थापन केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली २४ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४ डिसेंबर रोजी सामुदायिक रजा आंदोलन तर सोमवारी धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. एस. ढवळे, उपकार्यकारी अभियंता राजकुमार पांडव, बी. एन. तांबोळी, आर. बी. सूर्यवंशी, एस. आर. पडवळ, पी. आर. भोई, आर. जे. राजूरकर आदी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)