शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

व्यापाऱ्याच्या पाठीत मनपाने खुपसला खंजीर

By admin | Updated: August 17, 2014 01:43 IST

औरंगाबाद : शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना जकात किंवा एलबीटी यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने पुन्हा जकात लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

औरंगाबाद : शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना जकात किंवा एलबीटी यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने पुन्हा जकात लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांनी आज एका पत्रकार परिषदेत मनपाने व्यापाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.राज्यात सर्वच महापालिकांमध्ये पूर्वी जकात आकारणी करण्यात येत होती. व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केल्यानंतर शासनाने जकात हटवून एलबीटी लावला होता. आता व्यापाऱ्यांनी यालाही विरोध दर्शविला. त्याऐवजी जीएसटी प्रणाली लागू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शासनाने सर्व महापालिकांना जकात किंवा एलबीटी दोन्हीपैकी एक कोणताही कर लावण्याची मुभा दिली. औरंगाबाद महापालिकेने जकात कर लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आज चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआय) येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष राम भोगले आणि माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांनी महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादेतील एलबीटी प्रक्रिया राज्यासाठी रोल मॉडेल ठरली असताना परत जकात लावण्याचा विचार होतोच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते, तेव्हासुद्धा ७० टक्के कर भरण्यात आला. कारण शहराच्या विकासासाठी आम्ही सहकार्य केले. महापालिका प्रशासन शहराला पुढे नेण्याऐवजी उलट मागे नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही सर्व व्यापारी आणि उद्योजक बहिष्कार घालणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. औरंगाबादेत एलबीटीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपये जमा होत आहेत. एकट्या चिकलठाणा एमआयडीसीमधून एलबीटी आणि टॅक्सच्या माध्यमातून मनपाला ७२ कोटी रुपये मिळतात. जकातीसारखा वादग्रस्त विषय मनपाने हाताळू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा, अजय शहा, झोएब येवलावाला, मासिआचे अध्यक्ष भरत मोतिंगे, आयसाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, तनसुख झांबड आदींची उपस्थिती होती.