शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:02 IST

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा - प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून ...

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात गर्दीविषयी भीती निर्माण झाली आहे. यामुळे घरात बसून त्यांच्यात एकलकोंडेपणा, नैराश्य आले आहे. संवाद तुटल्याने मन हलके करता येत नसल्याने ताणतणाव वाढला आहे.

संवाद नसल्याने मनावरील ताण एवढा वाढतो की, नैराश्यातून आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी नैराश्य हे एक मोठे कारण ठरत आहे.

ताणतणाव कमी करण्यासाठी सुसंवाद साधने आवश्यक आहे. लहान मुलांनी मित्रांमध्ये खेळणे, मोठ्यांनी आपल्या समस्या जवळच्या मित्रांना सांगून आपले मन हलके करावे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

---

मन हलके करणे हाच उपाय

१) एकलकोंडे न होता नातेवाईक, मित्र परिवाराच्या संपर्कात राहणे.

२) मोबाइल, सोशल मीडियात जास्त न रमता जवळच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे.

3) एकमेकांना त्यांच्या उणिवासह स्वीकारणे.

४) स्वतःच्या भावना जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करणे.

५) लहान मुलांनी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा.

----

नैराश्य टाळा

एकांतवासाने नैराश्य निर्माण होते. यामुळे कोणी एकलकोंडेसारखे वागत असेल, तर अशा व्यक्तींकडे लगेच लक्ष द्या. त्यांच्याशी सतत बोलून, धीर देऊन मन हलके करायला लावा. अनेकदा नैराश्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

डॉ. रश्मीन अचलिया

---

प्रत्यक्ष भावना व्यक्त करा

सध्या लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात; मात्र त्याऐवजी त्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर प्रत्यक्ष व्यक्त करा. त्यामुळे भावनिक आधार मिळू शकतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते ऑनलाइनमुळे भावनिक राहिले नाही. संवाद नसल्याने विसंवाद तसेच गैरसमज निर्माण होण्याची जास्त भीती असते.

डॉ. आनंद काळे