शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:02 IST

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा - प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून ...

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात गर्दीविषयी भीती निर्माण झाली आहे. यामुळे घरात बसून त्यांच्यात एकलकोंडेपणा, नैराश्य आले आहे. संवाद तुटल्याने मन हलके करता येत नसल्याने ताणतणाव वाढला आहे.

संवाद नसल्याने मनावरील ताण एवढा वाढतो की, नैराश्यातून आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी नैराश्य हे एक मोठे कारण ठरत आहे.

ताणतणाव कमी करण्यासाठी सुसंवाद साधने आवश्यक आहे. लहान मुलांनी मित्रांमध्ये खेळणे, मोठ्यांनी आपल्या समस्या जवळच्या मित्रांना सांगून आपले मन हलके करावे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

---

मन हलके करणे हाच उपाय

१) एकलकोंडे न होता नातेवाईक, मित्र परिवाराच्या संपर्कात राहणे.

२) मोबाइल, सोशल मीडियात जास्त न रमता जवळच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे.

3) एकमेकांना त्यांच्या उणिवासह स्वीकारणे.

४) स्वतःच्या भावना जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करणे.

५) लहान मुलांनी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा.

----

नैराश्य टाळा

एकांतवासाने नैराश्य निर्माण होते. यामुळे कोणी एकलकोंडेसारखे वागत असेल, तर अशा व्यक्तींकडे लगेच लक्ष द्या. त्यांच्याशी सतत बोलून, धीर देऊन मन हलके करायला लावा. अनेकदा नैराश्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

डॉ. रश्मीन अचलिया

---

प्रत्यक्ष भावना व्यक्त करा

सध्या लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात; मात्र त्याऐवजी त्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर प्रत्यक्ष व्यक्त करा. त्यामुळे भावनिक आधार मिळू शकतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते ऑनलाइनमुळे भावनिक राहिले नाही. संवाद नसल्याने विसंवाद तसेच गैरसमज निर्माण होण्याची जास्त भीती असते.

डॉ. आनंद काळे