शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:02 IST

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा - प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून ...

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात गर्दीविषयी भीती निर्माण झाली आहे. यामुळे घरात बसून त्यांच्यात एकलकोंडेपणा, नैराश्य आले आहे. संवाद तुटल्याने मन हलके करता येत नसल्याने ताणतणाव वाढला आहे.

संवाद नसल्याने मनावरील ताण एवढा वाढतो की, नैराश्यातून आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी नैराश्य हे एक मोठे कारण ठरत आहे.

ताणतणाव कमी करण्यासाठी सुसंवाद साधने आवश्यक आहे. लहान मुलांनी मित्रांमध्ये खेळणे, मोठ्यांनी आपल्या समस्या जवळच्या मित्रांना सांगून आपले मन हलके करावे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

---

मन हलके करणे हाच उपाय

१) एकलकोंडे न होता नातेवाईक, मित्र परिवाराच्या संपर्कात राहणे.

२) मोबाइल, सोशल मीडियात जास्त न रमता जवळच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे.

3) एकमेकांना त्यांच्या उणिवासह स्वीकारणे.

४) स्वतःच्या भावना जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करणे.

५) लहान मुलांनी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा.

----

नैराश्य टाळा

एकांतवासाने नैराश्य निर्माण होते. यामुळे कोणी एकलकोंडेसारखे वागत असेल, तर अशा व्यक्तींकडे लगेच लक्ष द्या. त्यांच्याशी सतत बोलून, धीर देऊन मन हलके करायला लावा. अनेकदा नैराश्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

डॉ. रश्मीन अचलिया

---

प्रत्यक्ष भावना व्यक्त करा

सध्या लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात; मात्र त्याऐवजी त्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर प्रत्यक्ष व्यक्त करा. त्यामुळे भावनिक आधार मिळू शकतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते ऑनलाइनमुळे भावनिक राहिले नाही. संवाद नसल्याने विसंवाद तसेच गैरसमज निर्माण होण्याची जास्त भीती असते.

डॉ. आनंद काळे