शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
3
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
4
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
5
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
6
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
7
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
8
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
9
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
10
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
11
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
12
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
13
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
14
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
15
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
17
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
18
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
19
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
20
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:02 IST

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा - प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून ...

सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात गर्दीविषयी भीती निर्माण झाली आहे. यामुळे घरात बसून त्यांच्यात एकलकोंडेपणा, नैराश्य आले आहे. संवाद तुटल्याने मन हलके करता येत नसल्याने ताणतणाव वाढला आहे.

संवाद नसल्याने मनावरील ताण एवढा वाढतो की, नैराश्यातून आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी नैराश्य हे एक मोठे कारण ठरत आहे.

ताणतणाव कमी करण्यासाठी सुसंवाद साधने आवश्यक आहे. लहान मुलांनी मित्रांमध्ये खेळणे, मोठ्यांनी आपल्या समस्या जवळच्या मित्रांना सांगून आपले मन हलके करावे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

---

मन हलके करणे हाच उपाय

१) एकलकोंडे न होता नातेवाईक, मित्र परिवाराच्या संपर्कात राहणे.

२) मोबाइल, सोशल मीडियात जास्त न रमता जवळच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे.

3) एकमेकांना त्यांच्या उणिवासह स्वीकारणे.

४) स्वतःच्या भावना जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करणे.

५) लहान मुलांनी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा.

----

नैराश्य टाळा

एकांतवासाने नैराश्य निर्माण होते. यामुळे कोणी एकलकोंडेसारखे वागत असेल, तर अशा व्यक्तींकडे लगेच लक्ष द्या. त्यांच्याशी सतत बोलून, धीर देऊन मन हलके करायला लावा. अनेकदा नैराश्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

डॉ. रश्मीन अचलिया

---

प्रत्यक्ष भावना व्यक्त करा

सध्या लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात; मात्र त्याऐवजी त्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर प्रत्यक्ष व्यक्त करा. त्यामुळे भावनिक आधार मिळू शकतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते ऑनलाइनमुळे भावनिक राहिले नाही. संवाद नसल्याने विसंवाद तसेच गैरसमज निर्माण होण्याची जास्त भीती असते.

डॉ. आनंद काळे