शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याला मानसिक आधार

By admin | Updated: January 2, 2015 00:46 IST

बाळासाहेब जाधव , लातूर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी

बाळासाहेब जाधव , लातूरदिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी लातूर पंचायत समितीने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे़ या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आठवडाभरापासून सुरु केला आहे़ चालू वर्षामध्ये गारपीट व अल्प पर्जन्यमानामुळे खरीप व रबी हंगामही गेला़ परंतु शेतकऱ्याला दोन्हीही हंगामामध्ये उत्पन्न घेता आले नाही़ यामध्ये काही शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज, सोसायटीचे कर्ज, खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर पंचायत समितीचे सभापती रावसाहेब भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ०२३८२-२४२९९० हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे़ या नंबरवर संपर्क साधून शेतकऱ्याने आपल्या अडचणी सभापती रावसाहेब भालेराव, उपसभापती अ‍ॅड़ लक्ष्मण पाटील, गटविकास अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्याकडे मांडाव्यात. त्यातून मार्ग काढण्यासाठी लातूर पंचायत समिती प्रयत्नशील आहे़४लातूर पंचायत समितीच्या वतीने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला मानसीक आधार देण्याचे काम २२ डिसेंबरपासून सुरु केले आहे़ यामध्ये ९ दिवसात ५४ शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबरचा आधार घेऊन आपल्या अडचणी पंचायत समितीशी संपर्क साधून दूर केल्या आहेत़ कडबाकुट्टी यंत्राचे वाटप४लातूर पंचायत समिती अंतर्गत दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी टोल फ्री बरोबर इतर उपक्रमही हाती घेतले जात आहेत़ ४यामध्ये तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने आहे तो चारा जास्तीत जास्त दिवस पुरवणी व्हावा यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते २०६ शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्राचे वाटप केले आहे़लातूर तालुक्यासह शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांना मानसीक आधार देण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचे नियोजन करण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्याचे काम लातूर पंचायत समितीमार्फत सुरु करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्याचे नाव व नंबर घेण्यासाठी पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे़ - धनवंतकुमार माळी, गटविकास अधिकारी, पं़स़लातूर.