शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याला मानसिक आधार

By admin | Updated: January 2, 2015 00:46 IST

बाळासाहेब जाधव , लातूर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी

बाळासाहेब जाधव , लातूरदिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी लातूर पंचायत समितीने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे़ या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आठवडाभरापासून सुरु केला आहे़ चालू वर्षामध्ये गारपीट व अल्प पर्जन्यमानामुळे खरीप व रबी हंगामही गेला़ परंतु शेतकऱ्याला दोन्हीही हंगामामध्ये उत्पन्न घेता आले नाही़ यामध्ये काही शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज, सोसायटीचे कर्ज, खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर पंचायत समितीचे सभापती रावसाहेब भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ०२३८२-२४२९९० हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे़ या नंबरवर संपर्क साधून शेतकऱ्याने आपल्या अडचणी सभापती रावसाहेब भालेराव, उपसभापती अ‍ॅड़ लक्ष्मण पाटील, गटविकास अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्याकडे मांडाव्यात. त्यातून मार्ग काढण्यासाठी लातूर पंचायत समिती प्रयत्नशील आहे़४लातूर पंचायत समितीच्या वतीने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला मानसीक आधार देण्याचे काम २२ डिसेंबरपासून सुरु केले आहे़ यामध्ये ९ दिवसात ५४ शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबरचा आधार घेऊन आपल्या अडचणी पंचायत समितीशी संपर्क साधून दूर केल्या आहेत़ कडबाकुट्टी यंत्राचे वाटप४लातूर पंचायत समिती अंतर्गत दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी टोल फ्री बरोबर इतर उपक्रमही हाती घेतले जात आहेत़ ४यामध्ये तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने आहे तो चारा जास्तीत जास्त दिवस पुरवणी व्हावा यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते २०६ शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्राचे वाटप केले आहे़लातूर तालुक्यासह शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांना मानसीक आधार देण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचे नियोजन करण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्याचे काम लातूर पंचायत समितीमार्फत सुरु करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्याचे नाव व नंबर घेण्यासाठी पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे़ - धनवंतकुमार माळी, गटविकास अधिकारी, पं़स़लातूर.