शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्हा परिषद सदस्यांना पाच लाखांचा स्वेच्छा निधी हवाय; कायद्यात तरतूद नसतानाही सभेत ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:57 IST

जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या गटांमध्ये विकासकामे करण्यासाठी हक्काचा स्वेच्छा निधी असावा, या आशयाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्दे या ठरावाच्या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी सदस्यांना स्वेच्छा निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या कायद्यातच नाही, असे मत मांडले.

औरंगाबाद : जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या गटांमध्ये विकासकामे करण्यासाठी हक्काचा स्वेच्छा निधी असावा, या आशयाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तथापि, या ठरावाच्या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी सदस्यांना स्वेच्छा निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या कायद्यातच नाही, असे मत मांडले.

जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य विजय चव्हाण यांनी स्वेच्छा निधी असावा, यावर चर्चेला सुरुवात केली. खासदार-आमदारांप्रमाणे मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सदस्यांना स्वेच्छा निधीची तरतूद करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. तेव्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी जि.प. सदस्यांसाठी कायद्यात स्वेच्छा निधीची तरतूदच नाही; पण जालना जिल्हा परिषदेत तसा ठराव घेतला आणि स्वेच्छा निधीची तरतूद केली होती, अशी माहिती दिली.

तेव्हा अविनाश गलांडे, मधुकर वालतुरे, रमेश पवार, रमेश गायकवाड आदी सदस्यांनी आम्ही तसा ठराव मांडतो तुम्ही तो मंजूर करा, अशी मागणी केली. त्यावेळी अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी तुम्ही ठराव मांडा, त्यासंबंधी कोणत्या लेखाशीर्षचा निधी यासाठी राखीव ठेवायचा, ते आम्ही निर्णय घेऊ, असे सदस्यांना सांगितले. तेव्हा जि.प. सदस्यांसाठी ५ लाख रुपये स्वेच्छा निधी ठेवला जावा, या आशयाचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी