शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विषय वगळल्यामुळे सदस्य संतप्त

By admin | Updated: December 22, 2015 23:55 IST

औरंगाबाद : मागील सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले विषय अनुपालन पत्रिकेतून वगळल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत सभागृहाला धारेवर धरले.

औरंगाबाद : मागील सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले विषय अनुपालन पत्रिकेतून वगळल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत सभागृहाला धारेवर धरले. सभागृहाने विषय मंजूर केल्यानंतरही अध्यक्षांनी त्यासंबंधीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही, तर तो विषय मंजूर झाला नाही, असे समजायचे का? आम्ही सादर केलेले विषय अनुपालन (प्रोसिडिंग) पत्रिकेमधून कोणी वगळले? वैयक्तिक लाभाच्या योजना कधी मार्गी लागतील? सिंचन विभागात झालेल्या अनियमिततेसंबंधी दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत प्रामुख्याने महिला सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले.जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी सर्वसाधारण सभा सुरू झाली. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपाध्यक्ष दिनकर पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, शिक्षण सभापती विनोद तांबे, बांधकाम सभापती संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शीला चव्हाण आदींची उपस्थिती होती. एरव्ही सभागृह दणाणून सोडणारे ‘गोंधळी’ सदस्य मात्र आज थातुरमातुर प्रश्न उपस्थित करून अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या भूमिकेला एकप्रकारे मूकसंमती देत असल्याचे चित्र होते. सुरुवातीला अनुपालन पत्रिका न मिळाल्यामुळे महिला सदस्यांनी अध्यक्ष महाजन यांना जाब विचारला. अगोदर अनुपालन पत्रिका द्या मगच त्यावरील चर्चेला सुरुवात करा, असे म्हणत सामान्य प्रशासन विभागाचेही त्या महिला सदस्यांनी वाभाडे काढले. दरम्यान, सभेला सुरुवात होताच शिवसेनेच्या महिला सदस्यांनी आमच्या कामांसंबंधी अगोदर लेखी आश्वासन द्या. मगच सभा सुरू होईल, असा आग्रह धरत कामकाज बंद पाडले. तेव्हा अध्यक्ष महाजन यांनी महिला सदस्यांना सुनावले की, सभागृहाचे नियम पाळा. मी तुमचे निवेदन स्वीकारले आहे. तुमचे समाधान होईपर्यंत मी उत्तर देण्यास समर्थ आहे. अनुपालन पत्रिकेवर चर्चा होऊ द्या. तुम्हाला मी उद्या लेखी देतो, असे म्हणत त्या सदस्यांनी महाजन यांना खाली बसविले. महिला सदस्यांनी पोटतिडकेने कामांबाबत सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; पण सेना सदस्य स्वपक्षीय महिला सदस्यांच्या मदतीला धावले नाहीत. रामदास पालोदकर, संतोष माने, दीपक राजपूत, मनाजी मिसाळ व अन्य सदस्यांनी सिंचन, पाणी, शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर मत प्रकट केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा म्हणाले की, चौकशी समितीने या प्रकरणी तथ्य शोधन केले तेव्हा काही निविदा गहाळ असल्याचे निष्पन्न झाले होते. आता यापैकी ९२ निविदा सापडल्या आहेत. तेव्हा माने म्हणाले की, सापडलेल्या निविदांपैकी ज्यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नसेल, त्या निविदा रद्द करा. दीपक राजपूत म्हणाले की, किरकोळ चुकीमुळे ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित केले जाते; मग या प्रकरणातच जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी का घातले जाते. या प्रकरणावर शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी खुलासे प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.