शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मनपा समावेशप्रकरणी सुनावणी पूर्ण

By admin | Updated: August 6, 2015 01:02 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या अधिसूचनेस आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी खंडपीठाचे

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या अधिसूचनेस आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सातारा-देवळाई येथील रहिवासी राजेंद्र कानडे यांनी सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेस आव्हान दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सातारा-देवळाई ग्रामपंचायत बरखास्त करून २८ आॅगस्ट २०१४ रोजी तेथे नगर परिषदेची घोषणा केली. त्यानंतर लागलीच नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती केली. दरम्यान, महापालिकेची निवडणूक घोषित झाली. मनपाच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत मनपाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात सातारा-देवळाई नगर परिषदेचा मनपा हद्दीत समावेश करण्याची शिफारस शासनास करण्यात आली. त्यानुसार शासनाने यासंदर्भात ११ फेब्रुवारी २०१५ रोजी प्राथमिक अधिसूचना काढली. त्याला जि. प. सदस्य विनायक हिवाळे यांनी खंडपीठात आव्हान दिले. याचिकेच्या सुनावणीच्या वेळी प्राथमिक अधिसूचनेस स्थगिती दिल्याचे निवेदन शासनाच्या वतीने करण्यात आले. यावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली. याच संदर्भात अ‍ॅड. सतीश बी.तळेकर आणि अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांच्यामार्फत दुसरी याचिका दाखल करण्यात आली होती. दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी झाली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील किशोर गाढवे पाटील यांनी काम पाहिले. शासनाने १४ मे २०१५ रोजी शासनाने अधिसूचनेद्वारे सातारा-देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश केल्याचे जाहीर केले. या अधिसूचनेस राजेंद्र कानडे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. याचिकाकर्त्याचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगर पंचायत अधिनियम १९६५चे कलम ६ नुसार सातारा नगर परिषद बरखास्तीची अधिसूचना काढली नाही. त्यामुळे सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश करणारी १४ मे २०१५ ची अधिसूचना बेकायदेशीर घोषित करून सातारा-देवळाई नगर परिषदेचे अस्तित्व कायम ठेवावे.