शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनपा समावेशप्रकरणी सुनावणी पूर्ण

By admin | Updated: August 6, 2015 01:02 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या अधिसूचनेस आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी खंडपीठाचे

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या अधिसूचनेस आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सातारा-देवळाई येथील रहिवासी राजेंद्र कानडे यांनी सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेस आव्हान दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सातारा-देवळाई ग्रामपंचायत बरखास्त करून २८ आॅगस्ट २०१४ रोजी तेथे नगर परिषदेची घोषणा केली. त्यानंतर लागलीच नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती केली. दरम्यान, महापालिकेची निवडणूक घोषित झाली. मनपाच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत मनपाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात सातारा-देवळाई नगर परिषदेचा मनपा हद्दीत समावेश करण्याची शिफारस शासनास करण्यात आली. त्यानुसार शासनाने यासंदर्भात ११ फेब्रुवारी २०१५ रोजी प्राथमिक अधिसूचना काढली. त्याला जि. प. सदस्य विनायक हिवाळे यांनी खंडपीठात आव्हान दिले. याचिकेच्या सुनावणीच्या वेळी प्राथमिक अधिसूचनेस स्थगिती दिल्याचे निवेदन शासनाच्या वतीने करण्यात आले. यावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली. याच संदर्भात अ‍ॅड. सतीश बी.तळेकर आणि अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांच्यामार्फत दुसरी याचिका दाखल करण्यात आली होती. दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी झाली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील किशोर गाढवे पाटील यांनी काम पाहिले. शासनाने १४ मे २०१५ रोजी शासनाने अधिसूचनेद्वारे सातारा-देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश केल्याचे जाहीर केले. या अधिसूचनेस राजेंद्र कानडे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. याचिकाकर्त्याचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगर पंचायत अधिनियम १९६५चे कलम ६ नुसार सातारा नगर परिषद बरखास्तीची अधिसूचना काढली नाही. त्यामुळे सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश करणारी १४ मे २०१५ ची अधिसूचना बेकायदेशीर घोषित करून सातारा-देवळाई नगर परिषदेचे अस्तित्व कायम ठेवावे.