शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

अर्ध्या तासात गुंडाळली स्थायी समितीची सभा

By admin | Updated: December 31, 2016 00:21 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा गतवर्षीचा कोट्यवधी रूपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे.

जालना : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा गतवर्षीचा कोट्यवधी रूपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जि.प. तील १२ विभागांकडे पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांचे काय नियोजन केले याची माहिती पहिल्यांदा सभागृहाला देण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. परंतु सत्ताधाऱ्यांना ती देता आली नसल्याने संतप्त सदस्यांनी अर्धा तासात सभा गुंडाळली.शुक्रवारी जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात दुपारी अडीच वाजता स्थायी समितीची अखेरची सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, सीईओ दीपक चौधरी, अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कोल्हे, मुख्य लेखाधिकारी चव्हाण, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील कौसडीकर, सभापती लीलाबाई लोखंडे, राजेश राठोड, संभाजी उबाळे, सतीश टोपे, भगवान तोडावत, रामेश्वर सोनवणे, बाळासाहेब वाकुळणीकर आदीसह विविध विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.अखर्चित असलेला निधी कोठे खर्च करत आहात याचे काय नियोजन केले याची सविस्तर माहिती सभागृहसमोर ठेवण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी यावेळी केली. परंतु सभागृहात विविध विभागाचे अधिकारी सभेला गैरहजर असल्याचे कारण पुढे करत सत्ताधाऱ्यांनी असे नियोजन आत्ताच सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले. परंतु कोट्यवधी रूपयांचे नियोजन न झाल्यास आचार संहितेमध्ये विकासाचे कामे करता येणार नाही. याचे भान सत्ताधाऱ्यांना आहे की नाही असा संतप्त सवाल सदस्यांनी यावेळी केला. दलितवस्तीचे २० कोटी रूपये आणि ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हानियोजन समितीने दिलेले ६ कोटी रूपये अद्यापही अखर्चित आहेत. याचे कुठलेही नियोजन नसल्याचे सदस्यांनी आरोप केला. नियोजन झाले असे सत्ताधारी म्हणत असले तर काय नियोजन केले हे समोर ठेवण्याची मागणी सदस्यांनी केली परंतु सत्ताधाऱ्यांना नियोजन सभागृहासमोर ठेवता आले. त्यामुळे सभा अधार् तासातच गुंडाळली. अनेक विषयांवर चर्चाच होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)