शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पालिकेची सभा बारगळली

By admin | Updated: June 19, 2017 23:46 IST

बीड : नगरपालिकेत विविध विषयांवर चर्चा व्हावी, बीड पालिकेत विशेष सभा बोलावली होती. मात्र, ही सभा बारगळली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील नगरपालिकेत विविध विषयांवर चर्चा व्हावी, तसेच त्यावर उपाययोजना करता याव्यात, यासाठी बीड पालिकेत विशेष सभा बोलावली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती; परंतु काही कारणास्तव ती बदलून दुपारची ३ अशी ठेवली. मात्र, तरीही ही सभा बारगळली. राजकारण अन् वाद यामुळे ही सभा बारगळल्याची चर्चा पालिकेत ऐकावयास मिळाली.१ ते ७ जुलै यादरम्यान संपूर्ण राज्यात होणाऱ्या वन महोत्सवाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन विशेष सभा घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित केली होती. यासंदर्भात संपूर्ण नगरसेवकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमन १९६५ अन्वये परिशिष्टात नमूद केलेल्या कामकाजासाठी सभेस उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती. त्याप्रमाणे काकू-नाना आघाडीसह इतर सर्व नगरसेवक नगरपालिकेत सकाळी साडेदहा वाजता हजर झाले. त्याप्रमाणे त्यांनी येथील हजेरी पटावर वेळेसह स्वाक्षरी केली. सभेच्या वेळेपर्यंत त्यांनी वाट पाहिली; परंतु अचानक त्यांना पालिकेतील दूरध्वनीवरून फोन आला. सकाळची सभा रद्द करुन तिची वेळ दुपारी ३ वाजता ठेवल्याचे सांगण्यात आले. तरीही हे सर्व नगरसेवक पालिकेत ठाण मांडून होते. बारा वाजेपर्यंत नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी पालिकेत न आल्याने उपस्थित नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी, नगराध्यक्षांनी मनमानी कारभार चालविल्याचा आरोप करीत त्याला आळा बसवावा, अशी तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.दरम्यान, नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. वादविवाद, मतभेद याचा त्रास सर्वसामान्य जनतेसह पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यामुळे पालिकेतील दहशत उघड झाली होती.सभेतील चर्चेचे विषयनगरसेवकांना दिलेल्या नोटिसीत चार विषयांवर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट लिहिले होते. त्यात वृक्ष लागवड, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना व महिला सबलीकरण यांचा समावेश आहे. परंतु दिवसभरात पालिकेच्या सभागृहात विशेष सभा न झाल्याने या सर्व विषयांवरील चर्चा केवळ कागदापुरतीच राहिली.