शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

पालिकेची सभा बारगळली

By admin | Updated: June 19, 2017 23:46 IST

बीड : नगरपालिकेत विविध विषयांवर चर्चा व्हावी, बीड पालिकेत विशेष सभा बोलावली होती. मात्र, ही सभा बारगळली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील नगरपालिकेत विविध विषयांवर चर्चा व्हावी, तसेच त्यावर उपाययोजना करता याव्यात, यासाठी बीड पालिकेत विशेष सभा बोलावली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती; परंतु काही कारणास्तव ती बदलून दुपारची ३ अशी ठेवली. मात्र, तरीही ही सभा बारगळली. राजकारण अन् वाद यामुळे ही सभा बारगळल्याची चर्चा पालिकेत ऐकावयास मिळाली.१ ते ७ जुलै यादरम्यान संपूर्ण राज्यात होणाऱ्या वन महोत्सवाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन विशेष सभा घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित केली होती. यासंदर्भात संपूर्ण नगरसेवकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमन १९६५ अन्वये परिशिष्टात नमूद केलेल्या कामकाजासाठी सभेस उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती. त्याप्रमाणे काकू-नाना आघाडीसह इतर सर्व नगरसेवक नगरपालिकेत सकाळी साडेदहा वाजता हजर झाले. त्याप्रमाणे त्यांनी येथील हजेरी पटावर वेळेसह स्वाक्षरी केली. सभेच्या वेळेपर्यंत त्यांनी वाट पाहिली; परंतु अचानक त्यांना पालिकेतील दूरध्वनीवरून फोन आला. सकाळची सभा रद्द करुन तिची वेळ दुपारी ३ वाजता ठेवल्याचे सांगण्यात आले. तरीही हे सर्व नगरसेवक पालिकेत ठाण मांडून होते. बारा वाजेपर्यंत नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी पालिकेत न आल्याने उपस्थित नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी, नगराध्यक्षांनी मनमानी कारभार चालविल्याचा आरोप करीत त्याला आळा बसवावा, अशी तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.दरम्यान, नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. वादविवाद, मतभेद याचा त्रास सर्वसामान्य जनतेसह पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यामुळे पालिकेतील दहशत उघड झाली होती.सभेतील चर्चेचे विषयनगरसेवकांना दिलेल्या नोटिसीत चार विषयांवर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट लिहिले होते. त्यात वृक्ष लागवड, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना व महिला सबलीकरण यांचा समावेश आहे. परंतु दिवसभरात पालिकेच्या सभागृहात विशेष सभा न झाल्याने या सर्व विषयांवरील चर्चा केवळ कागदापुरतीच राहिली.