शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 15:22 IST

Now the central government has only 935 days left : आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल.

ठळक मुद्देहवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहेआजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली.

औरंगाबाद : फक्त मागण्या करण्याऐवजी त्या पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) सादर करावा. जेणे करून पाठपुरावा करणे शक्य होईल. आता सरकारच्या हातात फक्त ९३५ दिवस शिल्लक आहेत,असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांनी रविवारी केले. ( 'Meet with the project, not just discuss'; Now the central government has only 935 days left )

जालनारोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील सर्व उद्योग संस्थांतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल. आजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली. औरंगाबाद ते पुणे रेल्वेचे सर्वेक्षण, मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरण पाठपुरावा, विभागीय जेरियाट्रीक सेंटर, एम्स हॉस्पिटल, कन्व्हेन्शन सेंटर आणि मोठ्या आयटी पार्कसाठी मागणी केलेली आहे. त्यासह पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. इथून पुढे एक एक दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रत्येक दिवसांत शहर आणि जिल्ह्याच्या पदरात योजना आणण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांची आहे.

आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी, सीआयआयचे अध्यक्ष रमण आजगांवकर, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मसीआचे अध्यक्ष नारायण पवार, जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष जगन्नाथ काळे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, ऋषी बागला, मुकुंद भोगले, रणजित कक्कड, रितेश मिश्रा, सुनील रायथठ्ठा, रवींद्र कोंडेकर, जसवंत सिंग राजपूत, रसदीपसिंग चावला, प्रशांत देशपांडे, आशिष गर्दे, रमेश नागपाल यांच्यासह मॅजिक, एआयएसए, एआयसीए, एमसीटीसी, क्रेडाई, सीएएमएआयटी, पर्यटन, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट, सराफा, कपडा व्यापारी आदींसह विविध संस्थाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. प्रसाद कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्रसाद जाजू यांनी आभार मानले.

'बुलेट ट्रेन' मार्गी लावण्यासह नांदेड-मनमाड दुहेरीकरणास प्राधान्य : रावसाहेब दानवे

रडारसाठी पाठपुरावा केलाहवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले. रडारमुळे शहरापासून राज्यातील ५०० किलोमीटर अंतरावर हवामानाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. जी कामे असतील ती योग्य पद्धतीने अहवाल सादर करून करता येतील. मराठवाड्यासाठी रडार महत्त्वाचे का आहे, याबाबत लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

ऑरिकमध्ये आयटीपार्कसाठी पाठपुरावा करावाडॉ. कराड यांनी ऑरिक सिटीमध्ये दोन आयटी पार्क येण्यासाठी पाठपुरावा करावा. ऑरिकमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्रातील अँकर प्रोजेक्ट आणावा, अशी मागणी आमदार सावे यांनी केली. आमदार बागडे म्हणाले, कराड यांनी जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापाराला बळकटी द्यावी. चॅटर्जी म्हणाले, पुढील ३० वर्षांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटमध्ये प्रामुख्याने उद्योग, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण घटकांवर भर देणे गरजेचे आहे.

डॉ. कराड यांच्याकडून अपेक्षाऑरिकचे जागतिक स्तरावर मार्केटिंग करून अँकर प्रोजेक्ट आणणे, बिडकीन येथील मेडिसिन पार्कचे काम सुरू करणे, डिफेन्स क्लस्टर कार्यान्वित करणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट सुरू करणे, आयआयटी, एम्स हॉस्पिटल, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम पूर्ण करण्याच्या अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्याकडून असल्याचे आज चर्चासत्रात समोर आले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार