शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 15:22 IST

Now the central government has only 935 days left : आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल.

ठळक मुद्देहवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहेआजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली.

औरंगाबाद : फक्त मागण्या करण्याऐवजी त्या पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) सादर करावा. जेणे करून पाठपुरावा करणे शक्य होईल. आता सरकारच्या हातात फक्त ९३५ दिवस शिल्लक आहेत,असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांनी रविवारी केले. ( 'Meet with the project, not just discuss'; Now the central government has only 935 days left )

जालनारोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील सर्व उद्योग संस्थांतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल. आजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली. औरंगाबाद ते पुणे रेल्वेचे सर्वेक्षण, मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरण पाठपुरावा, विभागीय जेरियाट्रीक सेंटर, एम्स हॉस्पिटल, कन्व्हेन्शन सेंटर आणि मोठ्या आयटी पार्कसाठी मागणी केलेली आहे. त्यासह पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. इथून पुढे एक एक दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रत्येक दिवसांत शहर आणि जिल्ह्याच्या पदरात योजना आणण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांची आहे.

आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी, सीआयआयचे अध्यक्ष रमण आजगांवकर, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मसीआचे अध्यक्ष नारायण पवार, जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष जगन्नाथ काळे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, ऋषी बागला, मुकुंद भोगले, रणजित कक्कड, रितेश मिश्रा, सुनील रायथठ्ठा, रवींद्र कोंडेकर, जसवंत सिंग राजपूत, रसदीपसिंग चावला, प्रशांत देशपांडे, आशिष गर्दे, रमेश नागपाल यांच्यासह मॅजिक, एआयएसए, एआयसीए, एमसीटीसी, क्रेडाई, सीएएमएआयटी, पर्यटन, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट, सराफा, कपडा व्यापारी आदींसह विविध संस्थाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. प्रसाद कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्रसाद जाजू यांनी आभार मानले.

'बुलेट ट्रेन' मार्गी लावण्यासह नांदेड-मनमाड दुहेरीकरणास प्राधान्य : रावसाहेब दानवे

रडारसाठी पाठपुरावा केलाहवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले. रडारमुळे शहरापासून राज्यातील ५०० किलोमीटर अंतरावर हवामानाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. जी कामे असतील ती योग्य पद्धतीने अहवाल सादर करून करता येतील. मराठवाड्यासाठी रडार महत्त्वाचे का आहे, याबाबत लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

ऑरिकमध्ये आयटीपार्कसाठी पाठपुरावा करावाडॉ. कराड यांनी ऑरिक सिटीमध्ये दोन आयटी पार्क येण्यासाठी पाठपुरावा करावा. ऑरिकमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्रातील अँकर प्रोजेक्ट आणावा, अशी मागणी आमदार सावे यांनी केली. आमदार बागडे म्हणाले, कराड यांनी जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापाराला बळकटी द्यावी. चॅटर्जी म्हणाले, पुढील ३० वर्षांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटमध्ये प्रामुख्याने उद्योग, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण घटकांवर भर देणे गरजेचे आहे.

डॉ. कराड यांच्याकडून अपेक्षाऑरिकचे जागतिक स्तरावर मार्केटिंग करून अँकर प्रोजेक्ट आणणे, बिडकीन येथील मेडिसिन पार्कचे काम सुरू करणे, डिफेन्स क्लस्टर कार्यान्वित करणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट सुरू करणे, आयआयटी, एम्स हॉस्पिटल, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम पूर्ण करण्याच्या अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्याकडून असल्याचे आज चर्चासत्रात समोर आले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार