शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

..अखेर तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली सुरू

By admin | Updated: November 13, 2014 00:49 IST

जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे.

जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे. या पाणीपट्टीची वसुली काटेकोरपणे होण्यासाठी दोन पथकांची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून तर जुना जालना भागात जायकवाडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यातच जायकवाडी योजनेची देखभाल दुरूस्ती करण्यात आली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नगरपालिकेकडून आतापासूनच पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यात येत असल्याचा दावाही सूत्रांनी केला. परंतु अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. विद्युत पंप नादुरूस्त होणे असेही प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर शहरात तीनपट वाढीव पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जायकवाडी योजनेला सुमारे दीड वर्षे पूर्ण होत आहेत. अद्याप म्हणावे तसे पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेकडून झालेले नाही.त्यामुळे नागरिकांना आताच तीनपट वाढीवचा बोजा सहन होणार नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे अशा काळात तरी तीनपट वसुली करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता, पाणीपट्टीचे दर तीनपट वाढीव करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेण्यात आला आहे, व त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने पाणीपट्टीचे दरही वाढले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही अंमलबजावणी तुर्तास करू नये, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)जालना शहरात नागरिकांना पूर्वी पाणीपट्टीचे वार्षिक ८०६ रुपये दर आकारले जात होते. आता वार्षिक दर २७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच तीनपट वाढीव आकारणी होत आहे. परिणामी नागरिकांना भूर्दंड बसणार असून या वाढीची अंमलबजावणी सद्यस्थितीत तरी करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ४जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेवर दरमहा मोठा खर्च होत आहे. देखभाल, दुरूस्ती व वीज बिलांचा खर्च लाखोंच्या घरात गेलेला आहे. हा खर्च काढण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दीड वर्षापूर्वीच यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.