शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

..अखेर तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली सुरू

By admin | Updated: November 13, 2014 00:49 IST

जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे.

जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे. या पाणीपट्टीची वसुली काटेकोरपणे होण्यासाठी दोन पथकांची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून तर जुना जालना भागात जायकवाडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यातच जायकवाडी योजनेची देखभाल दुरूस्ती करण्यात आली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नगरपालिकेकडून आतापासूनच पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यात येत असल्याचा दावाही सूत्रांनी केला. परंतु अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. विद्युत पंप नादुरूस्त होणे असेही प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर शहरात तीनपट वाढीव पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जायकवाडी योजनेला सुमारे दीड वर्षे पूर्ण होत आहेत. अद्याप म्हणावे तसे पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेकडून झालेले नाही.त्यामुळे नागरिकांना आताच तीनपट वाढीवचा बोजा सहन होणार नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे अशा काळात तरी तीनपट वसुली करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता, पाणीपट्टीचे दर तीनपट वाढीव करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेण्यात आला आहे, व त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने पाणीपट्टीचे दरही वाढले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही अंमलबजावणी तुर्तास करू नये, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)जालना शहरात नागरिकांना पूर्वी पाणीपट्टीचे वार्षिक ८०६ रुपये दर आकारले जात होते. आता वार्षिक दर २७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच तीनपट वाढीव आकारणी होत आहे. परिणामी नागरिकांना भूर्दंड बसणार असून या वाढीची अंमलबजावणी सद्यस्थितीत तरी करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ४जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेवर दरमहा मोठा खर्च होत आहे. देखभाल, दुरूस्ती व वीज बिलांचा खर्च लाखोंच्या घरात गेलेला आहे. हा खर्च काढण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दीड वर्षापूर्वीच यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.