शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘मे हिट’ने बीडकर झाले घामाघूम

By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST

बीड : एप्रिलपर्यंत चाळिशीच्या आसपास असलेला पारा मे उजाडताच दोन अंशांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे बीडकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एप्रिलपर्यंत चाळिशीच्या आसपास असलेला पारा मे उजाडताच दोन अंशांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे बीडकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत. पोळणाऱ्या उन्हाचे चटके असह्य होत असून, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे.सकाळी सात वाजेपासूनच ऊन जाणवायला सुरुवात होते. दिवसभर त्याची तीव्रता कायम असते. सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत ही धग अशीच राहते. रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे मुश्किल बनत असून, या काळात जनजीवन ठप्प होऊन जाते. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. वाढत्या उन्हामुळे रसाळ फळांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.शिवाय, ज्यूस बार, रसवंती गजबजून गेल्या आहेत. बर्फालाही वाढती मागणी आहे. उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे शासकीय, तसेच खाजगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ४१-४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत.उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण महिनाभर उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हापासून बचावासाठी गॉगल, गमछे, टोप्या वापरण्यावर नागरिकांचा भर असून, कुलर, ए.सी., पंख्यांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे.वऱ्हाडींची लाही-लाहीलग्नसराईही असल्यामुळे बसगाड्या खचाखच भरून जात आहेत. खाजगी वाहनांनाही पसंती आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या आबालवृद्धांचेही उन्हामुळे हाल होत आहेत. हजारो वऱ्हाडींसाठी थंड पाणी व सावलीची सोय करताना वधू पक्षाची तारांबळ उडताना दिसून येत आहे.