शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

काळजीची गोष्ट; शहराचा पॉझिटिव्हिटी रेट २२ टक्क्‍यांपर्यंत पोहोचला; बरे होण्याचे प्रमाणही घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:55 IST

A matter of concern for Aurangabadkars over corona cases increased; जिल्ह्यात १ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचार तरी कोठे करावेत, असा मोठा प्रश्न प्रशासनाला पडत आहे. शहराचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ वरून थेट ८७.५४ टक्क्यांवर आले आहे.

औरंगाबाद : राज्यात मुंबई आणि नागपूरनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण औरंगाबाद शहरात आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट चक्क २१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना नियम अधिक कठोर करण्यास आजपासून सुरुवात केली. शहराचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ वरून थेट ८७.५४ टक्क्यांवर आले आहे.

जिल्ह्यात १ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ८० टक्के रुग्ण आढळून येत आहेत. ४ ते ५ हजार नागरिकांची तपासणी केली तर त्यात किमान ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पदमपुरा, एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी महापालिकेच्या तपासणी केंद्रांवर रुग्णांच्या रांगा लागलेल्या आहेत. शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचार तरी कोठे करावेत, असा मोठा प्रश्न प्रशासनाला पडत आहे. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये शहरात दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजाराच्या घरात राहणार आहे, असा अंदाज महापालिकेतील आरोग्य विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. दहा दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक प्रमाणात तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट जवळपास २२ तर रिकव्हरी रेट घसरत ८७ टक्क्यांवर आला.

१० वी, १२ वी च्या खाजगी शिकवण्या बंदरुग्णसंख्येचा उद्रेक पाहता प्रशासनाने आणखी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्री उशिरा मनपा प्रशासनाने शहरातील दहावी आणि बारावीच्या सर्व खाजगी शिकवण्या बंद करण्याचा आदेश जारी केला. परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अगोदर प्रशासनाने मुभा दिली होती. आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्याने हळूहळू कठोर निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद