शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

कटारिया, गगराणींच्या मारेक-यांना फाशी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:11 IST

शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील सकल मारवाडी समाजबांधवांसह व्यापा-यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे हा गत आठ दिवसांत दुसरा मोर्चा होता.शिवाजी पुतळा परिसरातील गुरुगणेश भवन येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्वात पुढे नितीन कटारिया यांची मुले व कुटुंबातील सदस्य होते. शहरातील व्यापा-यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला. शिवाजी पुतळा, कादराबाद, मस्तगडमार्गे मोर्चा गांधीचमन चौकात पोहोचला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मोर्चात सहभागी पदाधिकारी व व्यापा-यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, की दोन व्यापा-यांचे खून होणे गंभीर आहे. व्यापाºयांनी सुरक्षेसाठी स्वत: रिव्हॉल्वर वापरावेत का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कटारिया यांना संरक्षण दिले असते, तर ही घटना घडली नसती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, की जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालन्याचा बिहार झालाय का, असा सवाल उपस्थित केला. माजी आ. संतोष सांबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पारसनंद यादव, दीपक भुरेवाल यांनीही भावना व्यक्त केल्या. नितीन कटारियांचे वडील ताराचंद कटारिया व मुलगी पलक यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्यामुळे उपस्थितांचे मन हेलावले. माझ्या मुलाची हत्या करणाºयाला भर चौकात मारावे, अशी संतप्त भावना ताराचंद कटारिया यांनी व्यक्त केली. तर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तसे इतरांबाबत घडू नये यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे, अशी भावना पलक कटारिया हिने व्यक्त केली. मोर्चात उद्योजक किशोर अग्रवाल, संजय खोतकर, विनयकुमार कोठारी, हस्तिमल बंब, जगदीश भरतिया, गौतम मुनोत, रमेशचंद्र तवरावाला, राजेंद्र आबड, संजय मुथा, विजय कामड, सगीर अहमद, सुधाकर निकाळजे आदी उपस्थित होते. कटारिया व गगराणी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. पँथर्स रिपब्लिकन पार्टीनेही या मोर्चास पाठिंबा दिला. दरम्यान, सेवली येथेही व्यापारी महासंघाच्या वतीने मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते एस.एस. सारडा यांनी प्रशासनाला निवेदन दिले.