शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कटारिया, गगराणींच्या मारेक-यांना फाशी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:11 IST

शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील सकल मारवाडी समाजबांधवांसह व्यापा-यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे हा गत आठ दिवसांत दुसरा मोर्चा होता.शिवाजी पुतळा परिसरातील गुरुगणेश भवन येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्वात पुढे नितीन कटारिया यांची मुले व कुटुंबातील सदस्य होते. शहरातील व्यापा-यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला. शिवाजी पुतळा, कादराबाद, मस्तगडमार्गे मोर्चा गांधीचमन चौकात पोहोचला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मोर्चात सहभागी पदाधिकारी व व्यापा-यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, की दोन व्यापा-यांचे खून होणे गंभीर आहे. व्यापाºयांनी सुरक्षेसाठी स्वत: रिव्हॉल्वर वापरावेत का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कटारिया यांना संरक्षण दिले असते, तर ही घटना घडली नसती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, की जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालन्याचा बिहार झालाय का, असा सवाल उपस्थित केला. माजी आ. संतोष सांबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पारसनंद यादव, दीपक भुरेवाल यांनीही भावना व्यक्त केल्या. नितीन कटारियांचे वडील ताराचंद कटारिया व मुलगी पलक यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्यामुळे उपस्थितांचे मन हेलावले. माझ्या मुलाची हत्या करणाºयाला भर चौकात मारावे, अशी संतप्त भावना ताराचंद कटारिया यांनी व्यक्त केली. तर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तसे इतरांबाबत घडू नये यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे, अशी भावना पलक कटारिया हिने व्यक्त केली. मोर्चात उद्योजक किशोर अग्रवाल, संजय खोतकर, विनयकुमार कोठारी, हस्तिमल बंब, जगदीश भरतिया, गौतम मुनोत, रमेशचंद्र तवरावाला, राजेंद्र आबड, संजय मुथा, विजय कामड, सगीर अहमद, सुधाकर निकाळजे आदी उपस्थित होते. कटारिया व गगराणी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. पँथर्स रिपब्लिकन पार्टीनेही या मोर्चास पाठिंबा दिला. दरम्यान, सेवली येथेही व्यापारी महासंघाच्या वतीने मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते एस.एस. सारडा यांनी प्रशासनाला निवेदन दिले.