शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कटारिया, गगराणींच्या मारेक-यांना फाशी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:11 IST

शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया व अंबडचे व्यापारी पुत्र गोविंद गगराणी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील सकल मारवाडी समाजबांधवांसह व्यापा-यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे हा गत आठ दिवसांत दुसरा मोर्चा होता.शिवाजी पुतळा परिसरातील गुरुगणेश भवन येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्वात पुढे नितीन कटारिया यांची मुले व कुटुंबातील सदस्य होते. शहरातील व्यापा-यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला. शिवाजी पुतळा, कादराबाद, मस्तगडमार्गे मोर्चा गांधीचमन चौकात पोहोचला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मोर्चात सहभागी पदाधिकारी व व्यापा-यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, की दोन व्यापा-यांचे खून होणे गंभीर आहे. व्यापाºयांनी सुरक्षेसाठी स्वत: रिव्हॉल्वर वापरावेत का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कटारिया यांना संरक्षण दिले असते, तर ही घटना घडली नसती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, की जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालन्याचा बिहार झालाय का, असा सवाल उपस्थित केला. माजी आ. संतोष सांबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पारसनंद यादव, दीपक भुरेवाल यांनीही भावना व्यक्त केल्या. नितीन कटारियांचे वडील ताराचंद कटारिया व मुलगी पलक यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्यामुळे उपस्थितांचे मन हेलावले. माझ्या मुलाची हत्या करणाºयाला भर चौकात मारावे, अशी संतप्त भावना ताराचंद कटारिया यांनी व्यक्त केली. तर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तसे इतरांबाबत घडू नये यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे, अशी भावना पलक कटारिया हिने व्यक्त केली. मोर्चात उद्योजक किशोर अग्रवाल, संजय खोतकर, विनयकुमार कोठारी, हस्तिमल बंब, जगदीश भरतिया, गौतम मुनोत, रमेशचंद्र तवरावाला, राजेंद्र आबड, संजय मुथा, विजय कामड, सगीर अहमद, सुधाकर निकाळजे आदी उपस्थित होते. कटारिया व गगराणी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. पँथर्स रिपब्लिकन पार्टीनेही या मोर्चास पाठिंबा दिला. दरम्यान, सेवली येथेही व्यापारी महासंघाच्या वतीने मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते एस.एस. सारडा यांनी प्रशासनाला निवेदन दिले.