शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !

By admin | Updated: May 2, 2016 23:48 IST

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला.

ममदापूर परळीतील प्रकार : नवरीविनाच वऱ्हाडाला परतण्याची ओढावली नामुष्कीअविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाईनवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला. गावात एकाच मांडवात सहा लग्न होणार होते. पैकी पाच विवाह झाले. मात्र, एका वऱ्हाडाला व नवरदेवाला नवरीविनाच परतावे लागले. ममदापूर (परळी) येथील सीता ग्यानदेव लवटे हिचा विवाह धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव चंद्रकांत काळे याच्याशी जुळला होता. विवाहासाठी १ मे रोजी दुपारी १२.३५ चा मुहूर्त निवडला होता. या विवाहासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. एका मांडवात सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. रविवारी वधूपित्यांसह गावकरी लगबगीत होते. पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहनेही गावात धडकली. सुरुवातीला हे सरकारी पाहुणे विवाहासाठी आले असावेत, असे वाटले;पण झाले वेगळेच. अधिकाऱ्यांनी थेट सीता लवटे, बाबाराव काळे या जोडप्याची चौकशी सुरु केली. नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर, मंडळ अधिकारी बाबूराव दळवी, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ गिते यांनी शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ एवढे असल्याचे समोर आले. लेखी घेतलेमहसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पंचानामा केला. त्यानंतर वधू- वर व त्यांच्या नातेवाईकांकडून अल्पवशीन असल्याने विवाह रद्द करत असल्याचे लेखी लिहून घेतले. तक्रार अर्जावरुन कारवाईनवरदेवाच्या भावकीतील एकाने ममदापूर (परळी) येथे बालविवाह होत असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षकांसह तहसीलदार, ग्रामीण ठाणे निरीक्षक यांच्याकडे केली होती. अर्जासोबत नवरदेवाची जन्मतारीख ५ जुलै १९९९ असल्याचा निर्गम उतारा व लग्नपत्रिका पुरावा जोडला होता. त्यावरून खातरजमा झाली.बोहल्यावर चढण्यापूर्वीच बाबाराव- सीताचा हिरमोड !बाबाराव व नियोजित वधू सीता हे दोघेही गरीब कुटुंबातील. अल्पवयीन ठरल्याने त्यांचा विवाह रोखण्यात आला. इतर पाच विवाह ठरल्याप्रमाणे झाले. अंगावर हळद... हातावर मेहंदी... डोक्यावर मुंडावळ्या... व बोहल्यावर चढण्याचे वेध लागलेल्या बाबाराव व सीता यांना अपुऱ्या वयामुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. त्यांना इतर पाच जोडप्यांच्या विवाहात वऱ्हाडी बनण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर वरपक्षाकडील मंडळी नवरीविनाच आपल्या गावी परतले.