शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !

By admin | Updated: May 2, 2016 23:48 IST

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला.

ममदापूर परळीतील प्रकार : नवरीविनाच वऱ्हाडाला परतण्याची ओढावली नामुष्कीअविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाईनवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला. गावात एकाच मांडवात सहा लग्न होणार होते. पैकी पाच विवाह झाले. मात्र, एका वऱ्हाडाला व नवरदेवाला नवरीविनाच परतावे लागले. ममदापूर (परळी) येथील सीता ग्यानदेव लवटे हिचा विवाह धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव चंद्रकांत काळे याच्याशी जुळला होता. विवाहासाठी १ मे रोजी दुपारी १२.३५ चा मुहूर्त निवडला होता. या विवाहासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. एका मांडवात सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. रविवारी वधूपित्यांसह गावकरी लगबगीत होते. पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहनेही गावात धडकली. सुरुवातीला हे सरकारी पाहुणे विवाहासाठी आले असावेत, असे वाटले;पण झाले वेगळेच. अधिकाऱ्यांनी थेट सीता लवटे, बाबाराव काळे या जोडप्याची चौकशी सुरु केली. नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर, मंडळ अधिकारी बाबूराव दळवी, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ गिते यांनी शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ एवढे असल्याचे समोर आले. लेखी घेतलेमहसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पंचानामा केला. त्यानंतर वधू- वर व त्यांच्या नातेवाईकांकडून अल्पवशीन असल्याने विवाह रद्द करत असल्याचे लेखी लिहून घेतले. तक्रार अर्जावरुन कारवाईनवरदेवाच्या भावकीतील एकाने ममदापूर (परळी) येथे बालविवाह होत असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षकांसह तहसीलदार, ग्रामीण ठाणे निरीक्षक यांच्याकडे केली होती. अर्जासोबत नवरदेवाची जन्मतारीख ५ जुलै १९९९ असल्याचा निर्गम उतारा व लग्नपत्रिका पुरावा जोडला होता. त्यावरून खातरजमा झाली.बोहल्यावर चढण्यापूर्वीच बाबाराव- सीताचा हिरमोड !बाबाराव व नियोजित वधू सीता हे दोघेही गरीब कुटुंबातील. अल्पवयीन ठरल्याने त्यांचा विवाह रोखण्यात आला. इतर पाच विवाह ठरल्याप्रमाणे झाले. अंगावर हळद... हातावर मेहंदी... डोक्यावर मुंडावळ्या... व बोहल्यावर चढण्याचे वेध लागलेल्या बाबाराव व सीता यांना अपुऱ्या वयामुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. त्यांना इतर पाच जोडप्यांच्या विवाहात वऱ्हाडी बनण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर वरपक्षाकडील मंडळी नवरीविनाच आपल्या गावी परतले.