शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !

By admin | Updated: May 2, 2016 23:48 IST

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला.

ममदापूर परळीतील प्रकार : नवरीविनाच वऱ्हाडाला परतण्याची ओढावली नामुष्कीअविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाईनवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला. गावात एकाच मांडवात सहा लग्न होणार होते. पैकी पाच विवाह झाले. मात्र, एका वऱ्हाडाला व नवरदेवाला नवरीविनाच परतावे लागले. ममदापूर (परळी) येथील सीता ग्यानदेव लवटे हिचा विवाह धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव चंद्रकांत काळे याच्याशी जुळला होता. विवाहासाठी १ मे रोजी दुपारी १२.३५ चा मुहूर्त निवडला होता. या विवाहासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. एका मांडवात सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. रविवारी वधूपित्यांसह गावकरी लगबगीत होते. पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहनेही गावात धडकली. सुरुवातीला हे सरकारी पाहुणे विवाहासाठी आले असावेत, असे वाटले;पण झाले वेगळेच. अधिकाऱ्यांनी थेट सीता लवटे, बाबाराव काळे या जोडप्याची चौकशी सुरु केली. नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर, मंडळ अधिकारी बाबूराव दळवी, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ गिते यांनी शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ एवढे असल्याचे समोर आले. लेखी घेतलेमहसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पंचानामा केला. त्यानंतर वधू- वर व त्यांच्या नातेवाईकांकडून अल्पवशीन असल्याने विवाह रद्द करत असल्याचे लेखी लिहून घेतले. तक्रार अर्जावरुन कारवाईनवरदेवाच्या भावकीतील एकाने ममदापूर (परळी) येथे बालविवाह होत असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षकांसह तहसीलदार, ग्रामीण ठाणे निरीक्षक यांच्याकडे केली होती. अर्जासोबत नवरदेवाची जन्मतारीख ५ जुलै १९९९ असल्याचा निर्गम उतारा व लग्नपत्रिका पुरावा जोडला होता. त्यावरून खातरजमा झाली.बोहल्यावर चढण्यापूर्वीच बाबाराव- सीताचा हिरमोड !बाबाराव व नियोजित वधू सीता हे दोघेही गरीब कुटुंबातील. अल्पवयीन ठरल्याने त्यांचा विवाह रोखण्यात आला. इतर पाच विवाह ठरल्याप्रमाणे झाले. अंगावर हळद... हातावर मेहंदी... डोक्यावर मुंडावळ्या... व बोहल्यावर चढण्याचे वेध लागलेल्या बाबाराव व सीता यांना अपुऱ्या वयामुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. त्यांना इतर पाच जोडप्यांच्या विवाहात वऱ्हाडी बनण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर वरपक्षाकडील मंडळी नवरीविनाच आपल्या गावी परतले.