शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाजारपेठेत उत्साह; दैनंदिन व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात गेल्या १७ महिन्यांपासून आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना स्वातंत्र्य दिनापासून निर्बंधमुक्तीने मोठा दिलासा मिळाला. ...

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात गेल्या १७ महिन्यांपासून आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना स्वातंत्र्य दिनापासून निर्बंधमुक्तीने मोठा दिलासा मिळाला. संपूर्ण आठवडा रात्री १० वाजेपर्यंत व्यवसायाची मुभा मिळाल्याने बाजारपेठेत उत्साह पहायला मिळत आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याने विस्कटलेली आर्थिक घडी लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा व्यापारी, व्यावसायिकांनी व्यक्त केली.

निर्बंधमुक्तीचा पहिलाच दिवस आणि स्वातंत्र्य दिनाची सुटी, असा दुहेरी योग साधत पहिल्याच दिवशी रविवारी अनेकांनी खरेदीचा आणि हाॅटेल्समध्ये कुटुंबासह जेवणाचा आनंद घेतला. शहरातील खुल्या रेस्टाॅरंट, हाॅटेल्सला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातुलनेत बंदिस्त हाॅटेल्स, रेस्टाॅरंटला कमी प्रतिसाद राहिला. मात्र आगामी काळात त्याला प्रतिसाद वाढेल, अशी आशा हाॅटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. निर्बंधमुक्तीमुळे रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे.

लसीकरण प्रमाणपत्र पाहूनच माॅलमध्ये प्रवेश

माॅलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच ग्राहकांना माॅलमध्ये प्रवेश देण्यावर भर दिला जात आहे.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

अनेक दिवस पाठपुरावा केला आणि त्यास यश आले. रात्री १० वाजेपर्यंतची वेळ मिळाली. पहिल्या दिवशी खुल्या रेस्टाॅरंट, हाॅटेल्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वी दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ होती, मात्र यावेळेत कोणी जेवण्यासाठी येत नव्हते. आता यापुढे ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल.

- शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हाॅटेल्स रेस्टाॅरंट ओनर्स असोसिएशन

व्यवहार पूर्वपदावर

शासनाने घेतलेल्या निर्णयाचे व्यापारी महासंघ स्वागत करीत आहे. या निर्णयामुळे व्यापार पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे. आगामी आठवडाभरात पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन आहे.

- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ