शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत तुरीची होतेय विक्रमी आवक

By admin | Updated: March 3, 2017 01:26 IST

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीची विक्रमी उत्पादन होत आहे.

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीची विक्रमी उत्पादन होत आहे. परिणामी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेड तूर खरेदी केंद्रावर प्रचंड आवक सुरू असल्याने खरेदी बंद ठेवण्याची वेळ नाफेडवर आली आहे. बाजार समितीत सुमारे १ लाख क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सोबतच कडधान्य वर्ष असल्याने तुरीची सुमारे ३० हजारपेक्षा जास्त हेक्टरवर लागवड झाली. पावसामुळे अडीच लाख क्विंटल तुरीची उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, मंठा तालुक्यात विक्रमी आवक झाल्याने नाफेड केंद्राने खरेदी बंद ठेवली होती. आता शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर हे खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांच वाढती गर्दी नाफेडसाठी आवघड ठरत आहे. दिवसाकाठी तीन ते चार हजार क्विंटल तुरीची खरेदी होत आहे. नाफेड केंद्रात तुरीला ५०५० एवढा हमीभाव असल्याने शेतकऱ्यांचे पहिले प्राधान्य नाफेड केंद्रालाच आहे. खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा नाफेड केंद्रावर जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी थांबून नाफेडलाच तूर विक्री करीत आहे. जलाना येथील नाफेडचे अधिकारी शिवानंद पाटील म्हणाले ६२ हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची खरेदी झाली आहे. साडेतीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तूर विक्री केली आहे. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नाफेडकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तूर खरेदी सुरू आहे. यासाठी हमालमापडीसह पंधरा ते वीस कर्मचारी तूर खरेदी केंद्रात नियुक्त करण्यात आले आहेत.नवीन तूर आली तेव्हा नाफेड केंद्रावर आवक कमी होती. शेतकऱ्यांनी नगदी पैसे मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना पसंती दिली होती. अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर विक्री केली. बाजार समितीकडे सुमारे एक लाख क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाल्याची माहिती आहे. खाजगी व्यापारी तुरीला प्रत पाहुन साडेतीन हजार ते चार हजार रूपयांपर्यंतचा भाव देते होते. नाफेड केंद्राने तुरीला ५०५० एवढा हमी भाव जाहीर केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या नाफेड केंद्रावर उड्या पडत आहेत. जालना बाजार समितील केंद्रावर आजही हजारो शेतकरी तूर विक्रीसाठी मुक्कामी असल्याचे चित्र आहे. जालना तालुक्यासह परतूर व अंबड येथील नाफेड खरेदी केंद्रावरही तुरीची विक्रमी आवक सुरू आहे. दूरवर वाहनांच्या रांगा कायम आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गत दोन ते तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा तुरीच्या पिकांने सर्व उच्चांक मोडले आहेत. दोन लाख क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन निघत असून, गतवर्षी ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन निघाले होते असे कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी सांगितले.