शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत तुरीची होतेय विक्रमी आवक

By admin | Updated: March 3, 2017 01:26 IST

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीची विक्रमी उत्पादन होत आहे.

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीची विक्रमी उत्पादन होत आहे. परिणामी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेड तूर खरेदी केंद्रावर प्रचंड आवक सुरू असल्याने खरेदी बंद ठेवण्याची वेळ नाफेडवर आली आहे. बाजार समितीत सुमारे १ लाख क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सोबतच कडधान्य वर्ष असल्याने तुरीची सुमारे ३० हजारपेक्षा जास्त हेक्टरवर लागवड झाली. पावसामुळे अडीच लाख क्विंटल तुरीची उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, मंठा तालुक्यात विक्रमी आवक झाल्याने नाफेड केंद्राने खरेदी बंद ठेवली होती. आता शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर हे खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांच वाढती गर्दी नाफेडसाठी आवघड ठरत आहे. दिवसाकाठी तीन ते चार हजार क्विंटल तुरीची खरेदी होत आहे. नाफेड केंद्रात तुरीला ५०५० एवढा हमीभाव असल्याने शेतकऱ्यांचे पहिले प्राधान्य नाफेड केंद्रालाच आहे. खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा नाफेड केंद्रावर जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी थांबून नाफेडलाच तूर विक्री करीत आहे. जलाना येथील नाफेडचे अधिकारी शिवानंद पाटील म्हणाले ६२ हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची खरेदी झाली आहे. साडेतीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तूर विक्री केली आहे. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नाफेडकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तूर खरेदी सुरू आहे. यासाठी हमालमापडीसह पंधरा ते वीस कर्मचारी तूर खरेदी केंद्रात नियुक्त करण्यात आले आहेत.नवीन तूर आली तेव्हा नाफेड केंद्रावर आवक कमी होती. शेतकऱ्यांनी नगदी पैसे मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना पसंती दिली होती. अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर विक्री केली. बाजार समितीकडे सुमारे एक लाख क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाल्याची माहिती आहे. खाजगी व्यापारी तुरीला प्रत पाहुन साडेतीन हजार ते चार हजार रूपयांपर्यंतचा भाव देते होते. नाफेड केंद्राने तुरीला ५०५० एवढा हमी भाव जाहीर केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या नाफेड केंद्रावर उड्या पडत आहेत. जालना बाजार समितील केंद्रावर आजही हजारो शेतकरी तूर विक्रीसाठी मुक्कामी असल्याचे चित्र आहे. जालना तालुक्यासह परतूर व अंबड येथील नाफेड खरेदी केंद्रावरही तुरीची विक्रमी आवक सुरू आहे. दूरवर वाहनांच्या रांगा कायम आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गत दोन ते तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा तुरीच्या पिकांने सर्व उच्चांक मोडले आहेत. दोन लाख क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन निघत असून, गतवर्षी ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन निघाले होते असे कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी सांगितले.