शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

विवाहितेची आत्महत्या; पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:02 IST

मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार जालिंदर संपतराव तेरे (रा. पाचोड, ता. पैठण) यांची मुलगी कल्‍पनाचे ...

मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार जालिंदर संपतराव तेरे (रा. पाचोड, ता. पैठण) यांची मुलगी कल्‍पनाचे कृष्णासोबत २०१३ साली लग्न झाले. त्यांना ६ वर्षे आणि साडेतीन वर्षांची दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी तिचा पती कृष्णा आणि तिचे सासू, सासरे हे किरकोळ कारणावरून कल्पनासोबत भांडण करून तिला शिवीगाळ करून मारहाण करायचे. हा त्रास ती मुलांकडे पाहून सहन करायची. १० मे रोजी रात्री त्याने दारूच्या नशेत तिच्यासोबत भांडण केले होते. शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण रात्री २ वाजता सोडविले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता कृष्णाने कल्पनाच्या आईला फोन केला आणि तो शिव्या देऊ लागला. तिच्या वडिलांनी फोन घेताच त्याने कल्पनाकडे फोन दिला. तेव्हा ती रडत होती. नवऱ्याने दारू पिऊन तिला मारहाण केल्याचे तिने सांगितले. सासू-सासऱ्यांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तिने सांगितले. तुम्ही औरंगाबादला लवकर या, असे ती म्हणाली. ती फोनवर बोलत असतांना अचानक तिचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला.

काही वेळाने कल्पनाने गळफास घेतल्याचे तिच्या शेजाऱ्यांनी फोन करून त्यांना कळविले. या प्रकरणी तरे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात आरोपी कृष्णा, त्याचे वडील बाबासाहेब आणि आईविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तपास करीत आहेत.

===========(===

आरोपीला दारूचे व्यसन

कल्पनाचा पती फरशी बसविण्याचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत नेहमी पत्नीला मारहाण करायचा. बऱ्याचदा तिचे सासू-सासरे तिला मारहाण करीत.