शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वाळूजमध्ये मराठवाडा पाणी परिषदची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 20:48 IST

वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासह विविध उपाययोजना करण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच पपीन माने, मराठवाडा पाणी परिषदचे ज्ञानेश्वर निकम, ज्ञानेश्वर हनवते, अविनाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा सर्कलनिहाय आढावा घेण्यात आला. अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके हातची गेली असून, शेतकऱ्यांना अर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. आतापासून अनेक गावात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे पिके हातची गेल्यामुळे हंगामी रोजगारही बुडाला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. पशुधन कसे वाचवावे असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यावेळी बैठकीत अनेकांनी दुष्काळी स्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी केली. सूत्रसंचालन मंगल काळे तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. या बैठकीला विद्या भांबरे, अनिल नेमाणे, पांडुरंग गायकवाड,संदीप जगताप, द्रोपदा मोरे,सिंधु ठापसे, सुवर्णा मंडलिक, फरजाना सय्यद, निरंजन खैरनार, दीपक पाटणी, आदर्श पाटील आदीसह ४२ स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनाशासनाच्यावतीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शेतकरी व नागरिकांना विविध स्वरुपाची मदत केली जाणार असल्याचे सभापती ज्योती गायकवाड यांनी सांगितले. दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, संबंधित अधिकाºयांना या संदर्भात सूचना देण्यात येणार आहे. गावातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी वाळूजला १ डिसेंबरला जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती सभापती गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळWalujवाळूज