शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजमध्ये मराठवाडा पाणी परिषदची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 20:48 IST

वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासह विविध उपाययोजना करण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच पपीन माने, मराठवाडा पाणी परिषदचे ज्ञानेश्वर निकम, ज्ञानेश्वर हनवते, अविनाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत गंगापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा सर्कलनिहाय आढावा घेण्यात आला. अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके हातची गेली असून, शेतकऱ्यांना अर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. आतापासून अनेक गावात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे पिके हातची गेल्यामुळे हंगामी रोजगारही बुडाला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. पशुधन कसे वाचवावे असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यावेळी बैठकीत अनेकांनी दुष्काळी स्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी केली. सूत्रसंचालन मंगल काळे तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. या बैठकीला विद्या भांबरे, अनिल नेमाणे, पांडुरंग गायकवाड,संदीप जगताप, द्रोपदा मोरे,सिंधु ठापसे, सुवर्णा मंडलिक, फरजाना सय्यद, निरंजन खैरनार, दीपक पाटणी, आदर्श पाटील आदीसह ४२ स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनाशासनाच्यावतीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शेतकरी व नागरिकांना विविध स्वरुपाची मदत केली जाणार असल्याचे सभापती ज्योती गायकवाड यांनी सांगितले. दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, संबंधित अधिकाºयांना या संदर्भात सूचना देण्यात येणार आहे. गावातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी वाळूजला १ डिसेंबरला जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती सभापती गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळWalujवाळूज