शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

मराठवाड्याच्या पाणी परिषदेत प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:40 IST

जायकवाडी धरणाच्या म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत आ. प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.

ठळक मुद्देराजकीय धुमश्चक्री : समन्यायी पाणीवाटप परिषदेत राजकीय फटकेबाजी

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत आ. प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. बैठकीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांत अडविलेल्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांवरील चर्चेबरोबर राजकीय धुमश्चक्री आणि राजकीय फटकेबाजी झाली.आ. प्रशांत बंब यांनी प्रास्ताविकात जायकवाडीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून सध्या सोडाव्या लागणाऱ्या ११ टीएमसी पाण्यासह भविष्यात कराव्या लागणाºया प्रस्तावित जलयोजनांचा आढावा सादर केला. पश्चिम वाहिनी नद्यांतून मराठवाड्यासाठी पाणी आणणे, कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल, मध्य व वैनगंगा, निम्न वैनगंगा या उपखोºयातील पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करता येईल. मराठवाड्यात १५० टीएमसी पाण्याची तूट आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याच्या ठिकाणाहून पाणी आणावे लागेल, अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या प्रास्ताविकानंतर आ. सतीश चव्हाण हे मनोगत व्यक्त करण्यासाठी आले. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सुरुवातीपासूनच आ. बंब यांनी मांडलेल्या आकडेवारीवर आक्षेप घेतला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्वीच मंजूर आहे, त्याविषयी आ. बंब सांगत होते. प्रत्यक्षात योजनेला तोकडा निधी मिळत असल्याचे आ. चव्हाण यांनी नमूद केले. सध्या केवळ जायकवाडीच्या वरच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, योजनांसाठी निधी मिळवून घेतला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरविले तर पाणीयावर आ. प्रशांत बंब यांनी पुन्हा माईकचा ताबा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर ठरविले तर एका दिवसात जायकवाडीत पाणी येईल, असा शब्दरुपी हल्ला केला. त्यामुळे आ. सतीश चव्हाण यांनी पुन्हा माईकचा ताबा घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या भागासाठी आंदोलन करणे समर्थनीय आहे. शरद पवार हे बारामतीचे आहेत. त्यामुळे त्यांचा यात संबंध नाही. जलसंपदामंत्र्यांनी एक फोन केला तर पाणी सुटेल. केवळ राजकारणासाठी, मोठे होण्यासाठी मोठ्या व्यक्तींचे नाव घेऊ नये, असा टोला त्यांनी आ. बंब यांना लगावला. मनोगत व्यक्त केल्यानंतर आ.सतीश चव्हाण नाट्यगृहातून रवाना झाले.नारायण कुचे यांनाही टोलाआ. सतीश चव्हाण यांनी मनोगतात आ. नारायण कुचे यांनाही टोला लगावला. आ. बंब आणि आ. चव्हाण यांच्यात सुरू असलेल्या शाद्बिक चकमकीदरम्यान आ. कुचे टाळ्या वाजत होते. तेव्हा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला दाद द्यावीच लागेल, असे आ. चव्हाण म्हणाले. या कलगीतुºयानंतर संपूर्ण बैठकीचे स्वरूपच बदलून गेले. बैठकीला राजकीय स्वरूप आल्यानेच काहींनी न बोलण्यावर भर दिल्याची चर्चा बैठकीत सुरू होती.

टॅग्स :WaterपाणीPoliticsराजकारण