शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

मराठवाड्याच्या पाणी परिषदेत प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:40 IST

जायकवाडी धरणाच्या म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत आ. प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.

ठळक मुद्देराजकीय धुमश्चक्री : समन्यायी पाणीवाटप परिषदेत राजकीय फटकेबाजी

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत आ. प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. बैठकीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांत अडविलेल्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांवरील चर्चेबरोबर राजकीय धुमश्चक्री आणि राजकीय फटकेबाजी झाली.आ. प्रशांत बंब यांनी प्रास्ताविकात जायकवाडीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून सध्या सोडाव्या लागणाऱ्या ११ टीएमसी पाण्यासह भविष्यात कराव्या लागणाºया प्रस्तावित जलयोजनांचा आढावा सादर केला. पश्चिम वाहिनी नद्यांतून मराठवाड्यासाठी पाणी आणणे, कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल, मध्य व वैनगंगा, निम्न वैनगंगा या उपखोºयातील पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करता येईल. मराठवाड्यात १५० टीएमसी पाण्याची तूट आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याच्या ठिकाणाहून पाणी आणावे लागेल, अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या प्रास्ताविकानंतर आ. सतीश चव्हाण हे मनोगत व्यक्त करण्यासाठी आले. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सुरुवातीपासूनच आ. बंब यांनी मांडलेल्या आकडेवारीवर आक्षेप घेतला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्वीच मंजूर आहे, त्याविषयी आ. बंब सांगत होते. प्रत्यक्षात योजनेला तोकडा निधी मिळत असल्याचे आ. चव्हाण यांनी नमूद केले. सध्या केवळ जायकवाडीच्या वरच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, योजनांसाठी निधी मिळवून घेतला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरविले तर पाणीयावर आ. प्रशांत बंब यांनी पुन्हा माईकचा ताबा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर ठरविले तर एका दिवसात जायकवाडीत पाणी येईल, असा शब्दरुपी हल्ला केला. त्यामुळे आ. सतीश चव्हाण यांनी पुन्हा माईकचा ताबा घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या भागासाठी आंदोलन करणे समर्थनीय आहे. शरद पवार हे बारामतीचे आहेत. त्यामुळे त्यांचा यात संबंध नाही. जलसंपदामंत्र्यांनी एक फोन केला तर पाणी सुटेल. केवळ राजकारणासाठी, मोठे होण्यासाठी मोठ्या व्यक्तींचे नाव घेऊ नये, असा टोला त्यांनी आ. बंब यांना लगावला. मनोगत व्यक्त केल्यानंतर आ.सतीश चव्हाण नाट्यगृहातून रवाना झाले.नारायण कुचे यांनाही टोलाआ. सतीश चव्हाण यांनी मनोगतात आ. नारायण कुचे यांनाही टोला लगावला. आ. बंब आणि आ. चव्हाण यांच्यात सुरू असलेल्या शाद्बिक चकमकीदरम्यान आ. कुचे टाळ्या वाजत होते. तेव्हा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला दाद द्यावीच लागेल, असे आ. चव्हाण म्हणाले. या कलगीतुºयानंतर संपूर्ण बैठकीचे स्वरूपच बदलून गेले. बैठकीला राजकीय स्वरूप आल्यानेच काहींनी न बोलण्यावर भर दिल्याची चर्चा बैठकीत सुरू होती.

टॅग्स :WaterपाणीPoliticsराजकारण