शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारोह उरकण्याची घाई; नियोजन समिती कागदावरच

By विकास राऊत | Updated: September 1, 2023 20:59 IST

सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समितीची स्थापनादेखील केली, परंतु त्या समितीला देखील विश्वासात घेतले नसल्याने समिती कागदावरच राहिली आहे.

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपण्यास फक्त १६ दिवस उरले आहेत. या काळात सुमारे १६ ते २० कोटी रुपयांतून आठ जिल्ह्यांत सांस्कृतिक व विविध स्पर्धांचा धुरळा उडणार आहे. पूर्ण वर्ष गेले; परंतु, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनपातळीवरील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी पाऊल उचलले गेले नाही. सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समितीची स्थापनादेखील केली, परंतु त्या समितीला देखील विश्वासात घेतले नसल्याने समिती कागदावरच राहिली आहे. महोत्सवाची रूपरेषा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनीच ठरविली आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी नियोजन समितीतून दाेन कोटी रुपये देण्याचे ठरले असून चार कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले आहेत. चार कोटींंमधून प्रत्येक जिल्ह्याला ५० लाख याप्रमाणे मंजूर करण्यात आले आहेत. डीपीसीतून दाेन कोटी आणि शासनाचे ५० लाख असे प्रत्येक जिल्ह्याला अडीच कोटी रुपये सांस्कृतिक उपक्रमांसाठी मिळणार आहेत. लेबर कॉलनीतील १०० कोटींतून मुक्तिसंग्राम लढ्याचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सुशोभीकरण व इतर प्रस्तावांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

समितीला डावलून कार्यक्रमांचे नियोजनसांस्कृतिक विभागाने २७ जून २०२३ रोजी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी समिती स्थापन केली. त्यात १५ सदस्य आहेत. आ. अभिमन्यू पवार, डॉ. शिरीष खेडगीकर, निशिकांत भालेराव, सूर्यकांता पाटील, ॲड. आशिष वाजपेयी, राजकुमार धुरगुडे, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, डॉ. रश्मी बोरीकर, गायक उदय वाईकर, ॲड. जी. आर. देशमुख, ॲड. वामनराव चटप, सुभाष जावळे, नितीन चिलवंत, दीपक ढाकणे, लक्ष्मण निकम यांचा समितीत समावेश असून यातील कुणालाही गुरुवारी निमंत्रित करण्यात आले नव्हते.

घाईघाईच्या नियोजनावर काय बोलले मुनगंटीवार?अमृतमहाेत्सवी वर्ष संपत असताना घाईघाईने कार्यक्रम घेतले जात आहे काय, यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, वर्षभर सर्वांना विश्वासात घेऊन अनेक कार्यक्रम घेतले आहेत. घाईघाईने कार्यक्रमाचे नियोजन नाही. निधीदेखील वेळेत दिला. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सुशोभीकरणासाठीदेखील मनपाला निधी दिला.

विश्वासात घेणे गरजेचे होतेमुनगंटीवारांच्या उपस्थितीतील बैठकीची कल्पनाच नव्हती. मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाची सांगता समारोह करीत असताना मराठवाड्यात जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत किंवा त्यांची पिढी जे सध्या या विभागासाठी आस्थेने काम करीत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे गरजेचे होते.-डॉ. रश्मी बोरीकर, सदस्य मराठवाडा अमृतमहोत्सवी वर्ष समिती

टॅग्स :Marathwadaमराठवाडाcultureसांस्कृतिक