शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संतांची भूमी मराठवाड्यातील संतपीठाचे पुन्हा भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:00 IST

Saintpith in Paithan उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नवीन शैक्षणिक वर्षात संतपीठ सुरू करण्याची घोषणा १८ सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबादेत केली होती.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षात संतपीठ सुरू होण्यावर प्रश्नचिन्हर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले आहे. सध्या तरी संतपीठाचा खर्चही याच विद्यापीठाने करावा, असा शासनाचा प्रस्ताव

औरंगाबाद : संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या नावाने संतपीठ सुरू करण्याचा प्रस्ताव तब्बल ३८ वर्षांनंतरही अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले आहे. पण, सध्या तरी संतपीठाचा खर्चही याच विद्यापीठाने करावा, असा शासनाचा प्रस्ताव असल्यामुळे विद्यापीठाने खर्च करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नवीन शैक्षणिक वर्षात संतपीठ सुरू करण्याची घोषणा १८ सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबादेत केली होती. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यामध्ये लक्ष घालावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संतपीठाची रचना, प्रस्तावित अभ्यासक्रम, कार्यप्रणाली, आवश्यक खर्च, आदींबाबतचा सुधारित प्रस्ताव उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्यामार्फत शासनाला सादर केला. संतपीठ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था म्हणून लवकरात लवकर सुरू व्हावी, या अपेक्षेने कुलगुरू डॉ. येवले यांनी संतपीठाचे समन्वयक म्हणून रसायन तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

पैठण येथे सहा हजार ९५८ चौरस फूट भूखंडावर उभारण्यात आलेल्या संतपीठाच्या इमारतीचे उद्‌घाटन झाले. या प्रशासकीय इमारतीत भव्य सभागृह, वसतिगृह, अद्ययावत ग्रंथालय, उपाहारगृह तसेच टपाल कार्यालय व बँकेसाठी खोली, जलकुंभ उभारण्यात आला आहे. मात्र, उद्‌घाटनानंतर ही वास्तू बंद असल्यामुळे दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या असून इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या दुरुस्तीचे काम निविदा प्रक्रियेत आहे.

प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करावीउच्च शिक्षण संचालक धनराज माने म्हणाले की, विद्यापीठाने पाठविलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत. त्याची दुरुस्ती करून विद्यापीठाने तो सुधारित प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे. अद्याप दुरुस्ती केलेला प्रस्ताव आम्हांला मिळालेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार