शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

संतांची भूमी मराठवाड्यातील संतपीठाचे पुन्हा भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:00 IST

Saintpith in Paithan उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नवीन शैक्षणिक वर्षात संतपीठ सुरू करण्याची घोषणा १८ सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबादेत केली होती.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षात संतपीठ सुरू होण्यावर प्रश्नचिन्हर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले आहे. सध्या तरी संतपीठाचा खर्चही याच विद्यापीठाने करावा, असा शासनाचा प्रस्ताव

औरंगाबाद : संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या नावाने संतपीठ सुरू करण्याचा प्रस्ताव तब्बल ३८ वर्षांनंतरही अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले आहे. पण, सध्या तरी संतपीठाचा खर्चही याच विद्यापीठाने करावा, असा शासनाचा प्रस्ताव असल्यामुळे विद्यापीठाने खर्च करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नवीन शैक्षणिक वर्षात संतपीठ सुरू करण्याची घोषणा १८ सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबादेत केली होती. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यामध्ये लक्ष घालावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संतपीठाची रचना, प्रस्तावित अभ्यासक्रम, कार्यप्रणाली, आवश्यक खर्च, आदींबाबतचा सुधारित प्रस्ताव उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्यामार्फत शासनाला सादर केला. संतपीठ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था म्हणून लवकरात लवकर सुरू व्हावी, या अपेक्षेने कुलगुरू डॉ. येवले यांनी संतपीठाचे समन्वयक म्हणून रसायन तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

पैठण येथे सहा हजार ९५८ चौरस फूट भूखंडावर उभारण्यात आलेल्या संतपीठाच्या इमारतीचे उद्‌घाटन झाले. या प्रशासकीय इमारतीत भव्य सभागृह, वसतिगृह, अद्ययावत ग्रंथालय, उपाहारगृह तसेच टपाल कार्यालय व बँकेसाठी खोली, जलकुंभ उभारण्यात आला आहे. मात्र, उद्‌घाटनानंतर ही वास्तू बंद असल्यामुळे दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या असून इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या दुरुस्तीचे काम निविदा प्रक्रियेत आहे.

प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करावीउच्च शिक्षण संचालक धनराज माने म्हणाले की, विद्यापीठाने पाठविलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत. त्याची दुरुस्ती करून विद्यापीठाने तो सुधारित प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे. अद्याप दुरुस्ती केलेला प्रस्ताव आम्हांला मिळालेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार