शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील दुष्काळ आणि राजकारणातील ‘राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 14:04 IST

विश्लेषण : पवार-राज यांच्या जवळिकीतून काय घडते, हेही बघणे औत्सुक्याचेच ठरणार आहे. याचा नेमका फायदा कुणाला होईल, याबद्दलही राजकीय जाणकारांना कुतूहल आहेच. युत्या होतात, आघाड्या होतात, आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा असे राजकारणात सुरूच असते; पण ‘मनकी बात’काही वेगळीच असते. त्यातले ‘राज’ कळतच नसते. 

- स.सो. खंडाळकर

मराठवाड्यातील दुष्काळावर उपाययोजना लांबच राहिल्या; पण त्यावरचे राजकारण मात्र झपाट्याने तापत चाललेले दिसतेय आणि मग शरद पवार काही बोलले म्हटल्यावर त्यातली रंगत आणखी वाढतच जात असते. शरद पवारच काल औरंगाबादेत वारंवार राज्य शासनाला बजावत होते, ‘ही वेळ शब्दांचा खेळ खेळण्याची नाही.  बालिशपणा करण्याची नाही. शहाणपणाने वागण्याची व गांभीर्याने निर्णय घेण्याची आहे.’ या जाणत्या राजाचे हे अनुभवाचे बोल...! ‘सर्वज्ञ असल्यासारखे न वागता जरा जाणकारांचा सल्लाही घेत जावा’अशा शब्दांत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे कान पवार यांनी टोचले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अद्याप  आलेली नाही. ती काय येईल, याबद्दल औत्सुक्य असू शकते.

राजकारण बाजूला ठेवून मराठवाड्याच्या दुष्काळाची चर्चा झाली पाहिजे. त्यातले गांभीर्य हरवता कामा नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. अन्यथा दुष्काळग्रस्त मराठवाड्याशी मराठवाड्याच्या बाहेरची मंडळी प्रतारणा करीत आहेत, असा त्याचा अर्थ होईल. राज्यकर्ते कुणीही असोत, जरा पवारसाहेबांचे त्यांनी ऐकले पाहिजे. हक्काने काही सांगण्याची त्यांची पात्रता आहेच.

तरुणालाही लाजवणारी सक्रियताचिखलीतला कार्यक्रम आटोपून शरद पवार औरंगाबादेत आले. पत्रकारांच्या वार्तालापासाठी दिलेल्या वेळेच्या आतच पंचतारांकित हॉटेलच्या दालनात दाखल झाले. दुष्काळ, शेती, पाणी या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ते मनापासून आणि भरपूर बोलले. पवार यांची आजची सक्रियता तरुणाईलाही लाजवणारी अशीच आहे. दुर्धर आजारांवर त्यांनी खरोखरच विजय मिळवला आहे. एखाद्या ठिकाणी शरद पवार मुक्कामाला आले आणि तिथे काही घडामोड घडली नाही, असे कधी झाले नाही. कालही तसेच घडले. विदर्भाचाच दौरा आटोपून दुपारी २ वाजेपासून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले. पुण्यातल्या जाहीर मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातले सख्य वाढलेले आहे, हा अनुभव नवा नाही. आता या दोघांना औरंगाबादेत काय नुसत्याच गप्पा थोडीच मारायच्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेतच; पण शरद पवार औरंगाबादच्या पत्रपरिषदेत बरेच रमले. एकेका प्रश्नावर त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासपूर्ण तर होतीच; पण ती भावी महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त होती. 

हे सहज घडत नाही

आधी लवकर उठण्याची सवय लावून घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना एकेकाळी दिला होता. शरद पवार यांच्यावर अत्यंत कडवी आणि जहरी टीका करण्याची एकही संधी न सोडणारे राज ठाकरे हे पवार यांच्या एवढे निकट जाणे हेही एक गूढच. हे गूढ आता आणखीन गडद होत चाललेय. यातली बेरीज-वजाबाकी आगामी निवडणुकांमध्येच दिसेल कदाचित. शरद पवार यांची पत्रपरिषद लांबल्यामुळे औरंगाबादच्या पंचतारांकित हॉटेलमधील राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही; पण दोन्ही नेते विमानात शेजारी शेजारी बसून चर्चा करीत आहेत, हे दृश्य साऱ्या महाराष्ट्राने माध्यमाच्या माध्यमातून पाहिले. हे सहज घडत नाही. दुष्काळ आणि राजकारणातील ‘राज’ते हेच. 

औरंगाबादसाठी राष्ट्रवादी आग्रही

१९९९ पासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस हरत आली. चंद्रकांत खैरे यांची दरवेळीच लॉटरी लागत गेली. आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवीय. उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांचे नावही शरद पवार यांच्या तोंडून निघालेले आहे. महाराराष्ट्रातल्या सुमारे ४२ जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झालेले आहे. बोटावर मोजता येण्यासारख्या जागांवर निर्णय व्हायचाय. लवकरच तोही होऊन जाईल. नाहीतर राहुल गांधी आणि मी बसून निर्णय घेऊ, असे सुतोवाच पवार यांनी केलेय. औरंगाबादच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही दिसते. काय होते ते काळच ठरवेल. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणElectionनिवडणूकdroughtदुष्काळ