शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

पाणी कपातीमुळे मराठवाड्याचे नुकसान

By admin | Updated: May 14, 2016 00:11 IST

मराठवाड्याचे भविष्यकाळात मोठे औद्योगिक नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईसंबंधी राज्य तसेच केंद्र सरकारने दिलेल्या चुकीच्या संदेशांमुळे मराठवाड्याचे भविष्यकाळात मोठे औद्योगिक नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. लातूरला रेल्वेने पाणी आणल्याचा प्रकार तसेच मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची कपात यामुळे मराठवाड्याची देशभरात चुकीची जाहिरात झाली आहे. पाणी नसेल तर कोणता उद्योग येथे येईल. राज्य सरकारने पाण्यासंबंधी मराठवाड्याची ‘निगेटिव्ह’ इमेज तयार केली आहे. लातूर शहराला मांजरा धरणाचे पाणी येते. मांजरा धरणात पावसाअभावी पाण्याचा थेंब नाही, ही गोष्ट आठ महिन्यांपूर्वी माहीत असूनही राज्य सरकारने उपाययोजना केली नाही आणि आता रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. लातूरला येणाऱ्या पाण्याचे बिल राज्य सरकारने भरावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आपण दोन दिवसांत बीड जिल्ह्याचा सहा तालुक्यांतील दुष्काळी भागाचा दौरा केला असून, चारा छावण्यांचे दोन महिन्यांचे बिल दिले गेले नाही, अशी तक्रार संस्थाचालकांनी केली आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. नागरिकांनाही टँकरद्वारे दूषित पाणी दिले जात आहे, त्यामुळे रोगराईचा धोका आहे. चारा छावण्यांना प्रतिजनावर ७० ऐवजी १०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कोर्टाची वारंवार फटकारहे राज्य सरकार नीट चालावे, असे भाजपच्या कोणत्याही नेत्याला वाटत नाही. शिवसेनेचा तर प्रश्नच नाही. बरे सरकारला काय निर्णय घ्यावे हेच कळत नाही. त्यामुळे ते वारंवार चुका करीत आहे. अनेक वेळा ते बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आयपीएलपासून ते अनेक क्षेत्रात सरकारला न्यायालयाची फटकार पडली आहे. खरे तर हे सरकार भाजपचे लोक चालवीत नसून न्यायालयच चालवीत आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला. एलबीटी रद्द करण्याचा निर्णय मूर्खपणाचास्थानिक स्वराज संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याचा निर्णय मूर्खपणाचा आहे, अशी जोरदार टीकाही चव्हाण यांनी केली. व्यापाऱ्यांचा त्रास कमी झाला पाहिजे, हे खरे आहे. त्यासंबंधीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, मात्र एलबीटी रद्द करणे चुकीचेच आहे. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये अनेक व्यापारी त्यांच्या परीने कर भरतच होते. त्यामुळे या संस्थांमध्ये आर्थिक अडचण नव्हती, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, अरुण मुगदिया, अशोक सायन्ना यादव, समशेरसिंग सोधी आदी उपस्थित होते.