शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

वेगे वेगे धावू...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:52 IST

येथील फन रनर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील फन रनर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. राजकीय पदाधिका-यांसह राज्यभरातून आलेल्या २१०० स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. एकूणच सकाळच्या गुलाबी थंडीत मॅरेथॉन स्पर्धेने वातावरण भारावून गेले होते.जालनेकरांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरट्याल, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सकाळी झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी माजी आ. अरविंद चव्हाण, भाजप उपाध्यक्ष भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांची उपस्थिती होती.जालन्यात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धा पाहण्यासाठी जालनेकरांनी मंठा चौफुलीवर मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २१ किलोमीटर, दुसºया टप्प्यात १० कि.मी आणि तिसºया टप्प्यामध्ये पाच कि.मी गटातील स्पर्धक सहभागी झाले होते. २१ किलोमीटर स्पर्धकांसाठी शेवटचे अंतर सिंधी काळेगावपर्यंत ठेवण्यात आले होते. २१ आणि दहा कि.मी. गटात सहभागी स्पर्धकांच्या वेळीची अचूक नोंद घेण्यासाठी विशिष्ट इलेक्ट्रानिक चीपची सुविधा स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. स्पर्धकांना प्रोत्साहन वाढविण्यासाठी केली जाणारी कॉमेंट्री, संगीत व टाळ्यांमुळे वातावरणात उत्साह होता. स्पर्धकांना धावताना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने एका बाजूची वाहतूक पूर्णत: बंद केली होती. तसेच स्पर्धेच्या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. राजीव जेथलिया, डॉ. राजन उढाण, डॉ. संजय अंबेकर, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. किसन खिलारी यांच्यासह शहरातील डॉक्टर्स आणि फन रनर फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.हे ठरले मॅरेथॉन विजेतेस्पर्धेच्या २१ किलोमीटर गटात पुरुषांमध्ये मुंबईच्या शैलेश निसार यांनी प्रथम, औरंगाबादच्या डॉ. अजित घुले यांनी द्वितीय तर जालन्याचे प्रशांत भाले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये औरंगाबादच्या माधुरी निमजे, मुंबईच्या डॉ. मीनाक्षी कासाट आणि औरंगाबादच्या वर्षा देशमुख यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.दहा किलोमीटर गटात पुरुषांमध्ये औरंगाबादचे विजय शिंपी, भगवान कछवे व जालन्याचे विजय भाले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये औरंगाबादच्या अनुराधा कछवे, जालन्यातील ज्योती चव्हाण आणि मुंबईच्या नीता चौधरी या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.