शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेगे वेगे धावू...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:52 IST

येथील फन रनर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील फन रनर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. राजकीय पदाधिका-यांसह राज्यभरातून आलेल्या २१०० स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. एकूणच सकाळच्या गुलाबी थंडीत मॅरेथॉन स्पर्धेने वातावरण भारावून गेले होते.जालनेकरांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरट्याल, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सकाळी झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी माजी आ. अरविंद चव्हाण, भाजप उपाध्यक्ष भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांची उपस्थिती होती.जालन्यात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धा पाहण्यासाठी जालनेकरांनी मंठा चौफुलीवर मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २१ किलोमीटर, दुसºया टप्प्यात १० कि.मी आणि तिसºया टप्प्यामध्ये पाच कि.मी गटातील स्पर्धक सहभागी झाले होते. २१ किलोमीटर स्पर्धकांसाठी शेवटचे अंतर सिंधी काळेगावपर्यंत ठेवण्यात आले होते. २१ आणि दहा कि.मी. गटात सहभागी स्पर्धकांच्या वेळीची अचूक नोंद घेण्यासाठी विशिष्ट इलेक्ट्रानिक चीपची सुविधा स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. स्पर्धकांना प्रोत्साहन वाढविण्यासाठी केली जाणारी कॉमेंट्री, संगीत व टाळ्यांमुळे वातावरणात उत्साह होता. स्पर्धकांना धावताना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने एका बाजूची वाहतूक पूर्णत: बंद केली होती. तसेच स्पर्धेच्या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. राजीव जेथलिया, डॉ. राजन उढाण, डॉ. संजय अंबेकर, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. किसन खिलारी यांच्यासह शहरातील डॉक्टर्स आणि फन रनर फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.हे ठरले मॅरेथॉन विजेतेस्पर्धेच्या २१ किलोमीटर गटात पुरुषांमध्ये मुंबईच्या शैलेश निसार यांनी प्रथम, औरंगाबादच्या डॉ. अजित घुले यांनी द्वितीय तर जालन्याचे प्रशांत भाले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये औरंगाबादच्या माधुरी निमजे, मुंबईच्या डॉ. मीनाक्षी कासाट आणि औरंगाबादच्या वर्षा देशमुख यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.दहा किलोमीटर गटात पुरुषांमध्ये औरंगाबादचे विजय शिंपी, भगवान कछवे व जालन्याचे विजय भाले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये औरंगाबादच्या अनुराधा कछवे, जालन्यातील ज्योती चव्हाण आणि मुंबईच्या नीता चौधरी या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.