शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मॅरेथॉन फिवर महापालिकेतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:52 IST

मालमत्ता- पाणीपट्टीची वसुली अजिबात नाही. नवीन मालमत्ता शोधून कर लावण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. रस्त्यावर सायंकाळी दुचाकी वाहनेही नीट ये-जा करू शकत नाहीत, एवढी अतिक्रमणे झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालमत्ता- पाणीपट्टीची वसुली अजिबात नाही. नवीन मालमत्ता शोधून कर लावण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. रस्त्यावर सायंकाळी दुचाकी वाहनेही नीट ये-जा करू शकत नाहीत, एवढी अतिक्रमणे झाली आहेत. महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांवर नागरिक मौजमजा करीत आहेत. मनपाच्या अंतर्गत विभागांमध्ये अजिबात समन्वय नाही. त्यामुळे जिकडे तिकडे कारभार ‘आलबेल’ सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनही लक्ष देत नसल्याने शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण, मालमत्ता आणि करमूल्य निर्धारण विभागाची मॅरेथॉन बैठक घेतली. बैठकीत तिन्ही विभागाच्या यंत्रणेला उद्दिष्ट देऊन कामाला लावण्यात आले.अतिक्रमणांचे शहरहे चित्र बदलाशहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर हजारोंच्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. शहरात येणारे विदेशी आणि देशी पर्यटक हे विदारक चित्र पाहून आश्चर्य व्यक्त करतात. सायंकाळी ६ ते रात्री १० एकाही रस्त्यावर चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. दुचाकी वाहनधारकांचीही तीच अवस्था आहे. गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, शहागंज चमन परिसर, सिटीचौक, टी. व्ही. सेंटर रोड, गजानन महाराज मंदिर परिसर, क्रांतीचौक, टिळकपथ, जुना मोंढा आदी अनेक भागांत रस्त्यांवर हातगाड्या, टपºयांनी अतिक्रमणे केलेली दिसून येतात. शनिवारपासून सायंकाळी ६ ते १० यावेळेत पोलिसांच्या सहकार्याने एक पथक अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करावी. आजपासून एका जीपवर भोंगा लावून फेरीवाले, हातगाडीचालकांनी अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन करा, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. आठ दिवसांत शहराचे चित्र बदलेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.‘मालमत्ता’चीनीतिमत्ता गेली....महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे मालमत्ता विभाग होय. या विभागाचा आत्माच हरवला की काय असे वाटू लागल्याचे महापौरांनी नमूद केले. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांची देखभाल या विभागाकडे आहे. पण या विभागाकडे कोणत्याच मालमत्तेचे रेकॉर्ड नाही. नगर परिषदेच्या काळात ज्या मालमत्ता भाड्याने दिल्या, त्या भाडेकरूंची चक्क पीआर कार्डवर आपली नावे लावून मनपाच्या मालमत्ता विकून टाकल्या आहेत. बीओटी तत्त्वावर बांधलेल्या इमारतींमध्ये मनपाचा वाटा किती, त्या जागा ताब्यात घेतल्या का? सावंगी तलावाची (पान २ वर)वसुली नाही,तर विकास नाहीमहापौर नंदकुमार घोडेले यांनी करमूल्य निर्धारण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व वॉर्ड अधिकाºयांनी मागील आठ महिन्यांत केलेल्या वसुलीचे आकडे दिले. हे आकडे समाधानकारक नसल्याचे महापौरांनी नमूद केले. २३० कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त ४६ कोटींची वसुली झाली आहे. उर्वरित साडेतीन महिन्यांमध्ये किती वसुली होईल.? पूर्वी कर्मचारी नाही, अशी बोंब सुरू होती. आता आऊटसोर्सिंगने तब्बल १४५ कर्मचारी दिले. तरीही वसुली नाही. तिजोरीत पैसे नसल्याने शहराचा विकास खुंटला.