शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

विष पिऊन मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही. उलट आजची सुनावणी दोन आठवडे वाढविण्यात आल्याचे समजल्यामुळे नैराश्येतून एका तरुणाने थेट ...

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही. उलट आजची सुनावणी दोन आठवडे वाढविण्यात आल्याचे समजल्यामुळे नैराश्येतून एका तरुणाने थेट क्रांतीचौकात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दत्ता कचरू भोकरे (२८, रा. शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्ता भोकरे हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत सातत्याने सहभागी राहिलेला आहे. तो नोकरीच्या प्रतीक्षेतही होता. मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठल्यास नोकरी मिळेल या आशेवर तो होता. मराठा आरक्षणासंदर्भातील स्थगिती बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून उठविली जाईल अशी त्याला अपेक्षा होती. बुधवारी सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आणि स्थगिती उठविण्यात आली नसल्याचे त्याला समजल्याने तो अस्वस्थ झाला आणि रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रांतीचौकात आला.

यावेळी दत्ताने अचानक सोबत आणलेली विषाची बाटली तोंडाला लावली. ही बाब कुणीतरी मराठा आरक्षणावरील याचिकाकर्ते विनोद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांना कळविली. त्यांनी तातडीने क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांना फोन करून याविषयी माहिती दिली. पोलीस निरीक्षक दराडे आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ क्रांतीचौकात विष घेतलेल्या तरुणाला पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची नोंद क्रांतीचौक ठाण्यात करण्यात आली.

चौकट...

मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये

याविषयी याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, घाटीत उपचार घेत असलेल्या दत्ता भोकरेची भेट घेतली. तो बोलत आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. मराठा आरक्षणाची लढाई अद्याप संपली नाही. एवढ्या प्रयत्नाने मिळविलेले आरक्षण स्थगिती मिळाली असली तरी आपल्याला कायदेशीर लढाई लढायची आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये.