शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा मराठा महासभेचा इशारा, राज्यस्तरीय बैठकीत झाला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:19 IST

मराठा समाजाच्या मागण्यावर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासभेचे आयोजन करून यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय राज्यस्तरीय महासभेत घेण्यात आला. 

ठळक मुद्दे मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आता सरकारविरोधी वातावरण तयार करणे हा ऐकमेव पर्याय असल्याचे यावेळी सर्वानी नमूद केले.वर्षभर विविध मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या आजही जैसे थे असल्याने समाजात राज्य शासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

औरंगाबाद: वर्षभर विविध मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या आजही जैसे थे असल्याने समाजात राज्य शासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासभेचे आयोजन करून यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेतील गारखेडा परिसरातील एका मंगलकार्यालयात पार पडलेल्या राज्यस्तरीय महासभेत घेण्यात आला. 

कोपर्डीत घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर ९आॅगस्ट २०१६ पासून राज्यभर मराठा क्र ांती मोर्चे काढण्यात आले. शेवटचा मोर्चा ९ आॅगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या मोर्चानंतरही राज्यशासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे सोडविण्यात आल्या नाही. यापार्श्वभूमीवर रविवारी शहरात राज्यस्तरीय मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले.या सभेला राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यशासनाकडून निर्णयास होत असलेल्या विलंबातून शासन आपला सयंम पहात असल्याचे नमूद करण्यात आले. राज्यशासनाला मराठा समाजाशी काहीही देणे-घेणे नाही,असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन आहे. कोपर्डीतील पीडितेला अद्याप न्याय नाही, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीलाही बगल देण्यात आली, स्वामीनाथन आयोग लागू करण्याबाबत शासनाची उदासिनता आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या प्रमुख मागणीकडेही शासनाने दुर्लक्ष केले. या सर्व मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आता सरकारविरोधी वातावरण तयार करणे हा ऐकमेव पर्याय असल्याचे यावेळी सर्वानी नमूद केले.

यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्र म मराठा महासभा उधळून लावावा, राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या दारासमोर जाऊन बसावे आणि मराठा समाजाच्या मागण्यांचे काय झाले याबाबत त्यांना जाब विचारावा. पुढील दोन वर्षात निर्णय न झाल्यास आगामी निवडणूकांमध्ये विद्यमान, आमदार,खासदार यांना मतदान करू नये, असे आवाहन मराठा समाजाला करावे,त्यासाठी राज्यभर  मराठा महासभेचे आयोजनन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आजच्या महासभेसाठी तरुण, तरुणींची संख्या अधिक होती. 

मराठा क्र ांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी आजच्या महासभेकडे पाठ फिरविली होती. संयोजकांनी महासभेचे आयोजन करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आजच्या सभेला उपस्थित नसलेल्या आणि मराठा समाजासाठी तन-मन धनाने काम करणा-या प्रत्येकाला सोबत घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद