शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अनेक शाळांत खिचडी शिजेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:25 IST

मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही. दिवाळीच्या सुट्यांपूर्वी संपलेल्या तांदळाचा पुरवठाच न झाल्यामुळे अनेक शाळांमधील खिचडी बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घरी जावे लागत आहे.जिल्ह्यातील जि. प.च्या व अनुदानित १६०० शाळांमधील एक ते सातवीच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडीचे वाटप केले जाते.विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे, तसेच शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. असे असेल तरी मध्यान्ह भोजन योजना वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. सध्या जिल्ह्यातील अनेक शाळांमधील खिचडी गत आठवडाभरापासून बंद आहे. दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमधील तांदूळ व दाळ, मटकीचा साठा संपला. दिवाळीच्या सुट्या संपण्यापूर्वी यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वच शाळांमध्ये तांदूळ व अन्य साहित्य पुरविणे गरजेचे असताना, बहुतांश शाळांमध्ये तांदूळच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच्या तांदळाचा साठा आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात येत आहे.मात्र, साहित्य संपलेल्या जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी बंद आहे. जालना शहरातील काही शाळांचा यात समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही काहीसा परिणाम होत आहे.