शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

गुरुद्वारा प्रशासकीय समितीच्या निष्क्रियतेमुळे अनेक समस्या

By admin | Updated: September 11, 2014 00:41 IST

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड नांदेड: गुरुद्वारा सचखंडच्या प्रशासनिक व्यवस्थेकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन समितीची नियुक्ती केली

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेडनांदेड: गुरुद्वारा सचखंडच्या प्रशासनिक व्यवस्थेकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन समितीची नियुक्ती केली. परंतु प्रशासकीय समितीच्या निष्क्रीय कार्यपद्धतीमुळे नित्य उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास बोर्ड प्रशासनाला अपयश येत असल्याचे पहावयास मिळत आहे.गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासनाकरीता नुकतीच प्रशासकीय समिती गठीत केली. या समितीच्या अध्यक्षपदी सनदी अधिकारी विजय सतबीरसिंघ यांची नियुक्ती केली. या समितीच्या वतीने गुरुद्वारा बोर्डाचा कारभार पहावा, असे अपेक्षित आहे. परंतु अध्यक्षांना गुरुद्वाराच्या प्रशासनिक कामात लक्ष देण्याकरीता वेळ नसल्याने तेथे विविध समस्या निर्माण होत आहेत. बोर्ड प्रशासनाकडे शिरेपावचा असलेला साठा पूर्णपणे संपला असून नवीन खरेदीसंदर्भात निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे गुरुद्वाराच्या पूजा-अर्चनेत इतर साहित्य, रुमालेचा वापर करावा लागत आहे. यामुळे भाविकांत मोठा रोष निर्माण होत आहे. गुरुद्वारामध्ये व परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचा निर्णय देखील प्रलंबित आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले गुरुगोविंदसिंघजी वास्तुसंग्रहालय अद्यापही पूर्णत्वास गेले नसून केवळ इमारत उभी करण्यात आली आहे. दशमेश हॉस्पिटल हे गुरुद्वारा प्रशासनामार्फत चालविण्यात येते. येथील लाखो रुपये खर्च करुन आणण्यात आलेली एक्सरे मशीन गेल्या अनेक दिवसांपासून चालकाच्याअभावी बंद पडून आहे. यामुळे येणाऱ्या रुग्णांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी दसरा उत्सव सचखंड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. याकरीता देश-विदेशातून लाखो भाविक येथे येतात.त्याकरीता मोठ्या प्रमाणावर व्यवस्थेचे नियोजन करावे लागते. उत्सवात सहभागी होण्याकरीता लहेंगसिंघांचे दल आपल्या घोडस्वारांसह सचखंड येथे दाखल होतात. येथे नित्य येणाऱ्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात व दसरा उत्सव निर्विघ्न संपन्न व्हावा, याकरीता तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी शीख समाजातून होत आहे.