शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

शहरातील अनेक भागांत निर्जळी, नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 8, 2016 23:35 IST

जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकाराकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात गत आठ ते दहा दिवसांपासून विविध भागांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घाणेवाडी जलाशय पूर्णपणे कोरडाठाक पडल्याने नवीन जालना भागातील रहिवाशांना जायकवाडी ते जालना जलवाहिनीवर अवलंबून रहावे लागते आहे. मात्र, अंतर्गत जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना वेळे तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. नवीन तसेच जुना जालना भागातील रहिवाशांना विकतच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. कादराबाद, कन्हैयानगर, पॉवरलूम, बडीसडक, कॉलजेरोड, पेन्शनपुरा, मोदीखाना, रागनगर, कचेरी रोड, नूतन वसाहत, चंदनझिरा, लालबाग परिसर, संभाजी नगर आदी भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही भागांत जलवाहिनी नसल्यानेही नागरिकांचे हाल होत आहेत. ज्या भागात जलवाहिनी असली तरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.विशेष म्हणजे अंतर्गत जलवाहिनीची चाळणी झाल्याने नागरिकांना पाण्यापासूचन वंचित रहावे लागत आहे. अनेक भागांत जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने हाल होत आहेत. (प्रतिनिधी)जायकवाडी ते जालना या जलवाहिनीवर शंभरपेक्षा अधिक व्हॉल्व्ह आहेत. या व्हॉल्व्हला लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. चार महिन्यांनंतर लोखंडी जाळीही बसलेली नाही.४अंबड तसेच पाचोड रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी व्हॉल्व्हमधून बिघाड करून पाणी चोरी सुरू केली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने पालिका दुरूस्ती कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे.कडक उन्हामुळे बहुतांश भागातील कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. काही नागरिकांना दररोज जारचे पाणी घेणे सुरू केले आहे. ४काहींनी तर महिनेवारी जार लावले आहेत. उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठानांनंतर आता घरगुतीही जारचा महिना लावलेला आहे. टँकरचे दरही शंभर ते पाचशे रूपयांदरम्यान आहे.जायकवाडी ते जालना जलवाहिनी अंबड रस्त्यावर तसेच टीव्ही सेंटर परिसरात अनेक ठिकाणी फुटलेली आहे. किरकोळ दुरूस्ती केल्यानंतर पालिकेकडून कोणतीच चांगली दुरूस्ती होत नसल्याने दररोज पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळेही शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीही अंबड रस्त्यावर जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.