शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

शहरातील अनेक भागांत निर्जळी, नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 8, 2016 23:35 IST

जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकाराकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात गत आठ ते दहा दिवसांपासून विविध भागांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घाणेवाडी जलाशय पूर्णपणे कोरडाठाक पडल्याने नवीन जालना भागातील रहिवाशांना जायकवाडी ते जालना जलवाहिनीवर अवलंबून रहावे लागते आहे. मात्र, अंतर्गत जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना वेळे तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. नवीन तसेच जुना जालना भागातील रहिवाशांना विकतच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. कादराबाद, कन्हैयानगर, पॉवरलूम, बडीसडक, कॉलजेरोड, पेन्शनपुरा, मोदीखाना, रागनगर, कचेरी रोड, नूतन वसाहत, चंदनझिरा, लालबाग परिसर, संभाजी नगर आदी भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही भागांत जलवाहिनी नसल्यानेही नागरिकांचे हाल होत आहेत. ज्या भागात जलवाहिनी असली तरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.विशेष म्हणजे अंतर्गत जलवाहिनीची चाळणी झाल्याने नागरिकांना पाण्यापासूचन वंचित रहावे लागत आहे. अनेक भागांत जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने हाल होत आहेत. (प्रतिनिधी)जायकवाडी ते जालना या जलवाहिनीवर शंभरपेक्षा अधिक व्हॉल्व्ह आहेत. या व्हॉल्व्हला लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. चार महिन्यांनंतर लोखंडी जाळीही बसलेली नाही.४अंबड तसेच पाचोड रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी व्हॉल्व्हमधून बिघाड करून पाणी चोरी सुरू केली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने पालिका दुरूस्ती कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे.कडक उन्हामुळे बहुतांश भागातील कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. काही नागरिकांना दररोज जारचे पाणी घेणे सुरू केले आहे. ४काहींनी तर महिनेवारी जार लावले आहेत. उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठानांनंतर आता घरगुतीही जारचा महिना लावलेला आहे. टँकरचे दरही शंभर ते पाचशे रूपयांदरम्यान आहे.जायकवाडी ते जालना जलवाहिनी अंबड रस्त्यावर तसेच टीव्ही सेंटर परिसरात अनेक ठिकाणी फुटलेली आहे. किरकोळ दुरूस्ती केल्यानंतर पालिकेकडून कोणतीच चांगली दुरूस्ती होत नसल्याने दररोज पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळेही शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीही अंबड रस्त्यावर जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.