शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अनेक भागांत निर्जळी, नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 8, 2016 23:35 IST

जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकाराकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात गत आठ ते दहा दिवसांपासून विविध भागांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घाणेवाडी जलाशय पूर्णपणे कोरडाठाक पडल्याने नवीन जालना भागातील रहिवाशांना जायकवाडी ते जालना जलवाहिनीवर अवलंबून रहावे लागते आहे. मात्र, अंतर्गत जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना वेळे तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. नवीन तसेच जुना जालना भागातील रहिवाशांना विकतच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. कादराबाद, कन्हैयानगर, पॉवरलूम, बडीसडक, कॉलजेरोड, पेन्शनपुरा, मोदीखाना, रागनगर, कचेरी रोड, नूतन वसाहत, चंदनझिरा, लालबाग परिसर, संभाजी नगर आदी भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही भागांत जलवाहिनी नसल्यानेही नागरिकांचे हाल होत आहेत. ज्या भागात जलवाहिनी असली तरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.विशेष म्हणजे अंतर्गत जलवाहिनीची चाळणी झाल्याने नागरिकांना पाण्यापासूचन वंचित रहावे लागत आहे. अनेक भागांत जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने हाल होत आहेत. (प्रतिनिधी)जायकवाडी ते जालना या जलवाहिनीवर शंभरपेक्षा अधिक व्हॉल्व्ह आहेत. या व्हॉल्व्हला लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. चार महिन्यांनंतर लोखंडी जाळीही बसलेली नाही.४अंबड तसेच पाचोड रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी व्हॉल्व्हमधून बिघाड करून पाणी चोरी सुरू केली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने पालिका दुरूस्ती कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे.कडक उन्हामुळे बहुतांश भागातील कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. काही नागरिकांना दररोज जारचे पाणी घेणे सुरू केले आहे. ४काहींनी तर महिनेवारी जार लावले आहेत. उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठानांनंतर आता घरगुतीही जारचा महिना लावलेला आहे. टँकरचे दरही शंभर ते पाचशे रूपयांदरम्यान आहे.जायकवाडी ते जालना जलवाहिनी अंबड रस्त्यावर तसेच टीव्ही सेंटर परिसरात अनेक ठिकाणी फुटलेली आहे. किरकोळ दुरूस्ती केल्यानंतर पालिकेकडून कोणतीच चांगली दुरूस्ती होत नसल्याने दररोज पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळेही शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीही अंबड रस्त्यावर जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.