शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

औरंगाबादमध्ये आरटीई प्रवेशाच्या सोडतीकडे अनेक पालकांनी फिरवली पाठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:56 IST

शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली.

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली. प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या अर्ज क्रमांकानुसार सोडत पद्धतीने (लॉटरी सिस्टिम) निघालेले क्रमांक ‘एनआयसी’कडे पाठविण्यात आले. तथापि, मंगळवारच्या या पहिल्याच फेरीला मात्र अनेक पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. 

यंदा शिक्षण विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील ५६५ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ३७१ जागा निश्चित करण्यात आल्या असून, रविवारी अखेरच्या मुदतीपर्यंत ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज केले असले तरी निवास ते शाळा हे एक कि.मी.च्या आत अंतर असणार्‍या विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीसाठी विचार करण्यात आला. सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित केलेल्या या प्रवेश फेरीला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, रमेश ठाकूर, श्रीकांत दीक्षित व अन्य कर्मचारी उपस्थित होते.आज सोडत पद्धतीने काढण्यात आलेले क्रमांक ‘एनआयसी’ कार्यालयास पाठविण्यात आले. ‘एनआयसी’कडून उद्या रात्रीपर्यंत पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाबद्दल माहिती कळविण्यात येणार आहे. सोडत पद्धतीने मिळालेल्या शाळेत पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणे गरजचे आहे. त्यामुळे ‘एसएमएस’ आल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

सर्वांसमक्ष काढले नंबर; पारदर्शक प्रक्रियासंत तुकाराम नाट्यगृहात उपस्थित पालकांना राबविण्यात येणार्‍या लॉटरी सिस्टिमबद्दल अगोदर माहिती देण्यात आली. सर्वांसमक्ष काचेची चार भांडे ठेवण्यात आली. त्या चारही काचेच्या भांड्यांत ० ते ९ क्रमांकाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. पालकांसोबत आलेल्या बालकांच्या हाताने चारही भांड्यांतून प्रत्येकी एक अशा चार चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आॅनलाईन नोंदणी केलेल्या पालकांच्या अर्जांचा क्रमांक चारअंकी असल्यामुळे चार चिठ्ठ्या काढून चारअंकी क्रमांक जोडण्यात आला. अशा पद्धतीने क्रमांक काढून शिक्षण विभागाने पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवली. सदरील काढलेले क्रमांक तात्काळ ‘एनआयसी’ कार्यालयास कळविण्यात आले.