शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

चाचणीचे गुण उशिरा पाठविल्याने अनेकजण नापास; महाविद्यालयांच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:08 IST

महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नापास व्हावे लागले. या विद्यार्थ्यांचे उशिराने दाखल केलेले गुण ग्राह्य धरता येत नसल्याचा दावा परीक्षा विभागाने केला आहे.

विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांना चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम लागू केलेली आहे. यानुसार एकदा निकाल जाहीर केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करता येत नाही. मात्र अनेक महाविद्यालयांनी दिरंगाई करून प्रत्येक विषयासाठी असलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण विद्यार्थ्यांना दिलेच नाहीत. चाचणी परीक्षा घेऊनही वेळेत परीक्षा विभागाकडे गुण पाठविण्यात आले नाहीत. याचा परिणाम संलग्न महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना नापास झाले आहेत. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना या २० गुणांपैकी एकही मार्क मिळालेला नसल्यामुळे त्यांचा ग्रेड कमी झाला आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टीममध्ये निकाल रिवाईज करण्याची तरतूदच नसल्याचे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. याविषयी वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्यांनी कुलगुरू, परीक्षा संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यावर कोणीही गांभीर्याने विचार केला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

परीक्षा विभागानेच लावली सवयपदव्युत्तर अभ्यासक्रमांना तीन वर्षांपूर्वीच सीबीसीए सिस्टीम लागू केलेली आहे. दोन वर्षांपर्यंत परीक्षा विभाग अंतर्गत गुण महाविद्यालयाने सादर केले नसतील तर संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून मागवून घेत असे. महाविद्यालयांनी उशिरा दिलेला गुणांचा अहवाल स्वीकारण्यात येत होता. मात्र या सत्रापासून अचानक हे सर्व बंद करून निकाल जाहीर केले आहेत. तसेच उशिराने दाखल केलेले गुण नाकारले आहेत. या गुणांचा सर्वाधिक फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसत आहे.

प्रशासनाने तोडगा काढावाविद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना, त्यांनी नियमितपणे अंतर्गत चाचणी परीक्षा दिलेली असताना त्यांना गुण नाकारण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालून तोडगा काढवा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अमोल दांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय