शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अनेक विभागांत यंदा विद्यार्थी संख्या कमी...

By admin | Updated: July 12, 2016 01:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत. यामुळे विद्यापीठात उत्तम दर्जाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्ष़ा असताना विद्यार्थ्यांची संख्याच रोडावल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील मानव्य इमारतीमध्ये असलेल्या अनेक विभागांत विद्यार्थ्यांचा दुष्काळ असल्याची परिस्थिती आहे. तर विज्ञान विभागांमध्येही चार ते पाच विभाग सोडले तर विद्यार्थी संख्या कमीच आहे. विज्ञान विभागापेक्षा कला आणि सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमांची स्थिती बिकट असल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार विद्यापीठातील भाषा विभागांत मराठी, हिंदी या विभागांत पहिल्या वर्षीच्या पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत या दोन विभागांत संपूर्ण जागा भरल्या जात नाहीत. मराठी विभागात एम. ए. प्रथम वर्षासाठी यंदा सुमारे ६० पैकी ३५ जागा भरल्या गेल्या आहेत. हिंदी आणि संस्कृत विभागांतही हीच स्थिती आहे. सामाजिकशास्त्रे विभागांतील लोकप्रशासन विभागात ७० पैकी १६ जागा भरल्या गेल्या आहेत. शिक्षणशास्त्र विभागात ५० पैकी ३० जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र, या विभागात गेल्या वर्षीपेक्षा प्रतिसाद चांगला आहे. इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आदी विभागांत पटसंख्येपेक्ष़ा कितीतरी विद्यार्थी कमी असल्याचे दिसते. विज्ञान विभागात पर्यावरणशास्त्र विभागात प्रथम वर्षाच्या ३२ पैकी जागा भरल्या गेल्या आहेत. प्राणिशास्त्र विभागात ७० पैकी ५२ जागा भरल्या गेल्या आहेत. जैवरसायनशास्त्र विभागात २२ पैकी १८ जागा भरल्या गेल्या आहेत. संगणकशास्त्र विभागातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सला ३२ जागा असून, सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र एम. एस्सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात ३२ पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या आहेत. या अभ्यासक्रमाची फी अधिक असल्याने तेथे पटसंख्या रिक्त राहते. तेथे आणखी चार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा या विभागाला प्रतिसाद चांगला आहे. गणितशास्त्र आणि संख्याशास्त्र विभागातही उत्तम प्रतिसाद नाही. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रवेश तंत्रशिक्षण विभागातर्फे केले जातात. त्यामुळे अद्याप प्रवेशप्रक्रिया चालू आहे.