शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

अनेक विभागांत यंदा विद्यार्थी संख्या कमी...

By admin | Updated: July 12, 2016 01:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत. यामुळे विद्यापीठात उत्तम दर्जाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्ष़ा असताना विद्यार्थ्यांची संख्याच रोडावल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील मानव्य इमारतीमध्ये असलेल्या अनेक विभागांत विद्यार्थ्यांचा दुष्काळ असल्याची परिस्थिती आहे. तर विज्ञान विभागांमध्येही चार ते पाच विभाग सोडले तर विद्यार्थी संख्या कमीच आहे. विज्ञान विभागापेक्षा कला आणि सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमांची स्थिती बिकट असल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार विद्यापीठातील भाषा विभागांत मराठी, हिंदी या विभागांत पहिल्या वर्षीच्या पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत या दोन विभागांत संपूर्ण जागा भरल्या जात नाहीत. मराठी विभागात एम. ए. प्रथम वर्षासाठी यंदा सुमारे ६० पैकी ३५ जागा भरल्या गेल्या आहेत. हिंदी आणि संस्कृत विभागांतही हीच स्थिती आहे. सामाजिकशास्त्रे विभागांतील लोकप्रशासन विभागात ७० पैकी १६ जागा भरल्या गेल्या आहेत. शिक्षणशास्त्र विभागात ५० पैकी ३० जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र, या विभागात गेल्या वर्षीपेक्षा प्रतिसाद चांगला आहे. इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आदी विभागांत पटसंख्येपेक्ष़ा कितीतरी विद्यार्थी कमी असल्याचे दिसते. विज्ञान विभागात पर्यावरणशास्त्र विभागात प्रथम वर्षाच्या ३२ पैकी जागा भरल्या गेल्या आहेत. प्राणिशास्त्र विभागात ७० पैकी ५२ जागा भरल्या गेल्या आहेत. जैवरसायनशास्त्र विभागात २२ पैकी १८ जागा भरल्या गेल्या आहेत. संगणकशास्त्र विभागातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सला ३२ जागा असून, सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र एम. एस्सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात ३२ पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या आहेत. या अभ्यासक्रमाची फी अधिक असल्याने तेथे पटसंख्या रिक्त राहते. तेथे आणखी चार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा या विभागाला प्रतिसाद चांगला आहे. गणितशास्त्र आणि संख्याशास्त्र विभागातही उत्तम प्रतिसाद नाही. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रवेश तंत्रशिक्षण विभागातर्फे केले जातात. त्यामुळे अद्याप प्रवेशप्रक्रिया चालू आहे.