शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांना दोन कोटींचा गंडा

By admin | Updated: January 2, 2016 23:59 IST

औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा फंड मिळविण्यासाठी शहरातील औषधी व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेल्या टोळीतील दोन

औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा फंड मिळविण्यासाठी शहरातील औषधी व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेल्या टोळीतील दोन जणांची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. या आरोपींनी आपल्या साथीदारांच्या मदतीने पुणे, मुंबई, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथील पैसेवाल्यांना गाठून तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या टोळीतील अन्य सदस्यांची पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे. सिडकोतील औषधी व्यावसायिक अभिजित कुलकर्णी यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कोट्यवधींचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपी निवेदिता कुलकर्णी, विश्वनाथ अवचट,(रा.पुणे), बाळासाहेब दैठणकर, कमलाकर कुलकर्णी, सुरेश चव्हाण आणि अशोक जंगम (रा.मुंबई) यांनी संगनमत करून तब्बल ३५ लाख रुपयांना फसविले. आरोपी विश्वनाथ अवचट आणि निवेदिता कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केलेली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या या आरोपींची आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि फौजदार सुभाष खंडागळे यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. ही टोळी अत्यंत चाणाक्ष असल्याने ते आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यांनी २०१३ मध्ये अभिजित कुलकर्णी यांना अल्पावधीत मोठी कमाई करण्याची संधी असल्याचे सांगून तब्बल ३५ लाखांचा गंडा घातला. अशाच प्रकारे त्यांनी पुणे, मुंबई, परभणी, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर येथील पैशावाल्यांना आमिष दाखवून सुमारे दोन कोटी रुपयांना गंडविल्याची कबुली दिली आहे. या टोळीने विविध ठिकाणी एजंट नेमले असावे, असा पोलिसांना संशय आहे. बनावट अधिकारी अन् कागदपत्रेसामान्यांचा विश्वास बसावा, यासाठी आरोपी हे मातंगी संस्थेच्या नावाने आरबीआयकडून आलेले बनावट पत्र दाखवीत असत. इंग्रजीमधील या पत्रातील भाषा अत्यंत उच्च दर्जाची असायची, तसेच त्यावर आरबीआय गव्हर्नर अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही असल्याचे दाखवीत असत. त्यानंतरही जर संबंधितांचा विश्वास बसत नसेल तर त्यांच्यातील एक आरोपी आरबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून मुंबईत भेटत असत. शिवाय संस्थेच्या बँक खात्यात धनादेश अथवा आरटीजीएस प्रणालीने ते रक्कम घेत, त्यामुळे त्यांच्याबाबतीत संशय येत नव्हता. रक्कम मिळाल्यानंतर सुमारे दीड ते दोन वर्ष वेगवेगळी कारणे सांगून ते आरबीआयकडून फंड मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगायचे.