शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनेक  बांधवांनी आत्मबलिदान दिले, दिवाळी साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची माहिती

By बापू सोळुंके | Updated: November 12, 2023 14:29 IST

दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजबांधवांनी आत्मबलिदान दिले. कालच आपण देवगाव रंगारी येथे आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबियांना भेटून आलो. त्यांच्या घरातील परिस्थिती पाहून मन सुन्न झाले. अशा परिस्थितीत आम्ही यंदाची दिवाळी साजरी करणार नसल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत हाेते. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मराठा कुणबी नोंदींचा शोध सुरू झाली आहे. ज्यांच्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम झाले आहे. यामुळे हे ५०टक्के काम झाले. आता उर्वरित लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आपण आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे आपण सर्वांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारची प्रतिक्षा करू. १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करायचे आहेत. कोणीही आत्महत्या करू नये, आत्महत्या केल्यास आरक्षण कोणाला द्यायचे, असा सवालही त्यांनी तरूणांना केला.

राज्य सरकारने २४ डिसेंबर ही मुदत दिलेली असताना साखळी उपोषण सुरू करून मनोज जरांगे पाटील हे सरकारवर दबाव टाकत असल्याचा आरोप तुमच्यावर होत आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही साखळी उपोषण शांततेत करणार आहोत, शिवाय उपोषणही सनदशीर मार्गानेच केले. विदर्भातील मराठा बांधवांनी विनंती केल्याने त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी जाणार आहे, यातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसरकारनेही २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा मराठा समाजाला पुन्हा शांतीचे ब्रम्हास्त्र काढावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

ओबीसी नेत्यांनी जाती,पातीमध्ये भांडण लावू नये

ओबीसी नेते छगन भुजबळ हे अंबड येथे जाहिर सभा घेत आहेत. या सभेकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी समाजालाच वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केवळ ओबीसी नेते मराठा समाजाविरोधात विष पसरवित आहेत. ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना विरोध करण्याचा उगाच हट्ट धरू नये, जाती, जातीमध्ये भांडण लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDiwaliदिवाळी 2023Maratha Reservationमराठा आरक्षण