शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मास्क वापरण्याचे अनेक फायदे; कोरोनासह विषाणूजन्य आजारांनाही रोखण्यात ठरतोय सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:47 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याविषयी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देमास्कने अनेक आजारांना घातला आळामास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे. कोरोना दूर ठेवण्यासह  इतर विषाणू, संसर्गजन्य आजारही मास्कच्या वापराने रोखता येऊ शकतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी)  बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. मास्क वापरामुळे इतर विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे दिसते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याविषयी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव टाळण्यासाठी मदत होते. परंतु कोरोनाच्या संकटात अजूनही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळत आहेत. तर काही जणांचा मास्क हा गळ्यात अडविलेला दिसतो. परंतु मास्क हा केवळ कोरोनासाठीच नव्हे, तर विषाणूजन्य आजारांसाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे मास्क वापरण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.

मास्कने अनेक आजारांना घातला आळासर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ॲलर्जीचे रुग्णही यापूर्वी अधिक येत होते. विशेषत: धुळीच्या ॲलर्जीचे रुग्ण अधिक येत. परंतु, त्यांचीही संख्या घटली आहे. स्वाईन फ्लूचे रुग्णही येत नाहीत. सध्या कोल्ड ॲलर्जी म्हणजे थंडीमुळे काही प्रमाणात रुग्ण येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत ओपीडी सध्या जवळपास २५ टक्क्यांवर आली आहे. मास्कचा वापर फायदेशीर ठरतो, असे घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.

विषाणूजन्य आजारइन्फ्लूएंजा, स्वाईन फ्लू, फ्लू, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत गेली काही महिने मोठी घट झाली आहे. मास्क वापरामुळे श्वसनाद्वारे पसरणाऱ्या आजारांना आळा बसण्यास मदत होत आहे.

बाह्यरुग्ण विभागात  सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. मास्क वापर, हाताची स्वच्छता यामुळे विषाणूजन्य आजार कमी झाल्याचे दिसते.- डा. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक