शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मन्मथस्वामींमुळे वाढला वीरशैव समाजाचा लौकिक

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़

बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़ असे प्रकाश महारूद्र स्वामी महाराजांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ बुधवार पासून कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी यात्रा महोत्सव सुरू होत आहे़ विविध राज्यांमधून कपिलधार यात्रेसाठी लाखो भाविक एकत्र येतात़ यानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ मन्मथ स्वामी यांनी बीड तालुक्यातील कपिलधार येथे १५३५ च्या शतकात समाधी घेतली़ शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणजे महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे चैतन्य आहेत़ एवढेच नाही तर मराठी वीरशैव संत साहित्याचे जनक असणाऱ्या माऊलींनी धार्मीक, सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या वीरशैव समाजाला स्वत:चे अस्तित्व मिळवून दिलेले असल्याचे संतसाहित्य अभ्यासकांनी सांगितले़ महिमा मन्मथ स्वामींचाविरशैव समाज हा शिवभक्तीपासून वंचित होता.बदलत्या काळातही समाज हा अंधश्रद्धेच्या चक्रात अंधळा होत असल्याचे स्वीमींच्या निदर्शनास येताच समाजाला दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. हा समाज मठाच्या वैभवात आणि पिठाच्या अहंकारातच बेधुंद झाला होता. शिवभक्तीकरिता शिवदिक्षा, शिवज्ञान, शिवसंस्कार हे सर्व मार्ग त्यांनी समाजापुढे खुले केले. विरशैव समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी जंगमाचे व आचार्यांचे मोलाचे सहाकार्य घेतले. माणसा-माणसातील भेदभाव दूर करून समतावादी जीवनपद्धतीचा स्वीकार करण्यास स्वामींनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. परकिय आक्रमकांच्या भितीने व स्व स्वरुपाच्या विस्मृतीने घाबरलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे कामही मन्मथ स्वामी यांनी केले आहे. स्वामींच्या प्रयत्नाने वीरशैव समाजाला अनन्यसाधारण महत्वा प्राप्त झाले (प्रतिनिधी)कपिलधार ही कपिलमुनींच्या शिवयोग साधनेची पवित्रभूमी आहे. या भूमीत मन्मथस्वामींचे आगमन झाले, तेव्हापासून कपिलधाराचे भाग्य उदयाला आलेले आहे. मन्मथ स्वामींच्या आगमनाने या परिसरात वीरशैव समाजाचे सुवर्णयुग अवतरले होते. सकल वीरशैव समाजाला आणि कपिलधारचा उद्धार करण्यासाठी मन्मथ स्वामींच्या पदरात टाकण्यात आले होते. कपिलधारला निसर्गरम्य वातारणाने पर्यंटनाचा क्षेत्राचा दर्जा तर मन्मथ स्वामी या भूमीत अवतरल्याने तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.