शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

मन्मथस्वामींमुळे वाढला वीरशैव समाजाचा लौकिक

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़

बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़ असे प्रकाश महारूद्र स्वामी महाराजांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ बुधवार पासून कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी यात्रा महोत्सव सुरू होत आहे़ विविध राज्यांमधून कपिलधार यात्रेसाठी लाखो भाविक एकत्र येतात़ यानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ मन्मथ स्वामी यांनी बीड तालुक्यातील कपिलधार येथे १५३५ च्या शतकात समाधी घेतली़ शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणजे महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे चैतन्य आहेत़ एवढेच नाही तर मराठी वीरशैव संत साहित्याचे जनक असणाऱ्या माऊलींनी धार्मीक, सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या वीरशैव समाजाला स्वत:चे अस्तित्व मिळवून दिलेले असल्याचे संतसाहित्य अभ्यासकांनी सांगितले़ महिमा मन्मथ स्वामींचाविरशैव समाज हा शिवभक्तीपासून वंचित होता.बदलत्या काळातही समाज हा अंधश्रद्धेच्या चक्रात अंधळा होत असल्याचे स्वीमींच्या निदर्शनास येताच समाजाला दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. हा समाज मठाच्या वैभवात आणि पिठाच्या अहंकारातच बेधुंद झाला होता. शिवभक्तीकरिता शिवदिक्षा, शिवज्ञान, शिवसंस्कार हे सर्व मार्ग त्यांनी समाजापुढे खुले केले. विरशैव समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी जंगमाचे व आचार्यांचे मोलाचे सहाकार्य घेतले. माणसा-माणसातील भेदभाव दूर करून समतावादी जीवनपद्धतीचा स्वीकार करण्यास स्वामींनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. परकिय आक्रमकांच्या भितीने व स्व स्वरुपाच्या विस्मृतीने घाबरलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे कामही मन्मथ स्वामी यांनी केले आहे. स्वामींच्या प्रयत्नाने वीरशैव समाजाला अनन्यसाधारण महत्वा प्राप्त झाले (प्रतिनिधी)कपिलधार ही कपिलमुनींच्या शिवयोग साधनेची पवित्रभूमी आहे. या भूमीत मन्मथस्वामींचे आगमन झाले, तेव्हापासून कपिलधाराचे भाग्य उदयाला आलेले आहे. मन्मथ स्वामींच्या आगमनाने या परिसरात वीरशैव समाजाचे सुवर्णयुग अवतरले होते. सकल वीरशैव समाजाला आणि कपिलधारचा उद्धार करण्यासाठी मन्मथ स्वामींच्या पदरात टाकण्यात आले होते. कपिलधारला निसर्गरम्य वातारणाने पर्यंटनाचा क्षेत्राचा दर्जा तर मन्मथ स्वामी या भूमीत अवतरल्याने तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.