शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

मन्मथस्वामींमुळे वाढला वीरशैव समाजाचा लौकिक

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़

बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़ असे प्रकाश महारूद्र स्वामी महाराजांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ बुधवार पासून कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी यात्रा महोत्सव सुरू होत आहे़ विविध राज्यांमधून कपिलधार यात्रेसाठी लाखो भाविक एकत्र येतात़ यानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ मन्मथ स्वामी यांनी बीड तालुक्यातील कपिलधार येथे १५३५ च्या शतकात समाधी घेतली़ शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणजे महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे चैतन्य आहेत़ एवढेच नाही तर मराठी वीरशैव संत साहित्याचे जनक असणाऱ्या माऊलींनी धार्मीक, सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या वीरशैव समाजाला स्वत:चे अस्तित्व मिळवून दिलेले असल्याचे संतसाहित्य अभ्यासकांनी सांगितले़ महिमा मन्मथ स्वामींचाविरशैव समाज हा शिवभक्तीपासून वंचित होता.बदलत्या काळातही समाज हा अंधश्रद्धेच्या चक्रात अंधळा होत असल्याचे स्वीमींच्या निदर्शनास येताच समाजाला दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. हा समाज मठाच्या वैभवात आणि पिठाच्या अहंकारातच बेधुंद झाला होता. शिवभक्तीकरिता शिवदिक्षा, शिवज्ञान, शिवसंस्कार हे सर्व मार्ग त्यांनी समाजापुढे खुले केले. विरशैव समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी जंगमाचे व आचार्यांचे मोलाचे सहाकार्य घेतले. माणसा-माणसातील भेदभाव दूर करून समतावादी जीवनपद्धतीचा स्वीकार करण्यास स्वामींनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. परकिय आक्रमकांच्या भितीने व स्व स्वरुपाच्या विस्मृतीने घाबरलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे कामही मन्मथ स्वामी यांनी केले आहे. स्वामींच्या प्रयत्नाने वीरशैव समाजाला अनन्यसाधारण महत्वा प्राप्त झाले (प्रतिनिधी)कपिलधार ही कपिलमुनींच्या शिवयोग साधनेची पवित्रभूमी आहे. या भूमीत मन्मथस्वामींचे आगमन झाले, तेव्हापासून कपिलधाराचे भाग्य उदयाला आलेले आहे. मन्मथ स्वामींच्या आगमनाने या परिसरात वीरशैव समाजाचे सुवर्णयुग अवतरले होते. सकल वीरशैव समाजाला आणि कपिलधारचा उद्धार करण्यासाठी मन्मथ स्वामींच्या पदरात टाकण्यात आले होते. कपिलधारला निसर्गरम्य वातारणाने पर्यंटनाचा क्षेत्राचा दर्जा तर मन्मथ स्वामी या भूमीत अवतरल्याने तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.