शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

‘मांजरा’चा झराही आटला !

By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST

लातूर : लातूरकरांना पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लातूर : लातूरकरांना पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराच्या अनेक भागांत १५ दिवस लोटले तरी नळाला पाणी आले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय आहे. पाण्यासाठी वाढती ओरड लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने शहरात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. आठवडाभरात चार टँकर वाढले आहेत. पुढील आठवड्यात आणखी टँकर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. चर खोदूनही पंपाला पाणी अपुरे पडत आहे. मांजरा धरणातील झरेही आटले आहेत. धरणातील पाणीसाठा घटल्याने लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढली आहे. सध्या मनपाच्या मालकीचे असलेल्या सार्वजनिक विंधन विहिरींचा व हातपंपाचा काही भागात आधार उरला आहे. अनेक भागांत पाण्यासाठी वादावादी होत आहे. सद्य:स्थितीेत विंधन विहिरीवरच पाणीपुरवठ्याची मदार आहे. मांजरा धरणातून होणारा पाण्याचा उपसा अत्यल्प प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर नागझरी बंधाऱ्यातूनही पाणीसाठा कमी झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गल्लोगल्ली पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ज्या भागात जलवाहिनी अपुरी आहे किंवा पाण्याचे स्त्रोत नाहीत, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लेबर कॉलनी, सम्राट चौक, काजी मोहल्ला, अंजली नगर आदी भागांत सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शहरात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात चार टँकरची भर पडली आहे. पाऊस न पडल्यास आणखी टँकर वाढतील. त्यामुळे शहरातील पाणी असलेल्या खाजगी मालकीच्या विंधन विहिरी अधिग्रहण करण्याचा विचार मनपा करीत आहे.पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले...मांजरा व नागझरी प्रकल्पातून पाणीसाठा घटल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले आहे. १ ते ८ जुलैपर्यंतच्या वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठा १३ जुलैपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. ११ ते १८ जुलैपर्यंतचा दुसरा व २१ ते २८ जुलैपर्यंतचा तिसरा पाणीपुरवठा, २३ ते ३० जुलैपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. याच बदलाप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.आठवडाभरात चार टँकर वाढले, आणखी वाढणार...मांजरा प्रकल्पातील पाणी आटल्यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाममांजरा प्रकल्पात चर खोदून पाणी उपशापर्यंत आणण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न लातूर महानगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मागील आठवड्यात १४ टँकरच्या माध्यमातून शहराच्या टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात होता. चालू आठवड्यात नागरिकांची ओरड वाढली. पाण्याचे स्त्रोत काही ठिकाणचे बंद पडल्याने चार टँकर वाढविण्यात आले आहेत. सध्या १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पुढील आठवड्यात आणखी ४ टँकर वाढविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.