शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

‘मांजरा’चा झराही आटला !

By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST

लातूर : लातूरकरांना पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लातूर : लातूरकरांना पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराच्या अनेक भागांत १५ दिवस लोटले तरी नळाला पाणी आले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय आहे. पाण्यासाठी वाढती ओरड लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने शहरात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. आठवडाभरात चार टँकर वाढले आहेत. पुढील आठवड्यात आणखी टँकर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. चर खोदूनही पंपाला पाणी अपुरे पडत आहे. मांजरा धरणातील झरेही आटले आहेत. धरणातील पाणीसाठा घटल्याने लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढली आहे. सध्या मनपाच्या मालकीचे असलेल्या सार्वजनिक विंधन विहिरींचा व हातपंपाचा काही भागात आधार उरला आहे. अनेक भागांत पाण्यासाठी वादावादी होत आहे. सद्य:स्थितीेत विंधन विहिरीवरच पाणीपुरवठ्याची मदार आहे. मांजरा धरणातून होणारा पाण्याचा उपसा अत्यल्प प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर नागझरी बंधाऱ्यातूनही पाणीसाठा कमी झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गल्लोगल्ली पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ज्या भागात जलवाहिनी अपुरी आहे किंवा पाण्याचे स्त्रोत नाहीत, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लेबर कॉलनी, सम्राट चौक, काजी मोहल्ला, अंजली नगर आदी भागांत सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शहरात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात चार टँकरची भर पडली आहे. पाऊस न पडल्यास आणखी टँकर वाढतील. त्यामुळे शहरातील पाणी असलेल्या खाजगी मालकीच्या विंधन विहिरी अधिग्रहण करण्याचा विचार मनपा करीत आहे.पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले...मांजरा व नागझरी प्रकल्पातून पाणीसाठा घटल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले आहे. १ ते ८ जुलैपर्यंतच्या वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठा १३ जुलैपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. ११ ते १८ जुलैपर्यंतचा दुसरा व २१ ते २८ जुलैपर्यंतचा तिसरा पाणीपुरवठा, २३ ते ३० जुलैपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. याच बदलाप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.आठवडाभरात चार टँकर वाढले, आणखी वाढणार...मांजरा प्रकल्पातील पाणी आटल्यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाममांजरा प्रकल्पात चर खोदून पाणी उपशापर्यंत आणण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न लातूर महानगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मागील आठवड्यात १४ टँकरच्या माध्यमातून शहराच्या टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात होता. चालू आठवड्यात नागरिकांची ओरड वाढली. पाण्याचे स्त्रोत काही ठिकाणचे बंद पडल्याने चार टँकर वाढविण्यात आले आहेत. सध्या १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पुढील आठवड्यात आणखी ४ टँकर वाढविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.