शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

By नजीर शेख | Updated: April 27, 2024 16:57 IST

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ७२.९४ टक्के मते घेऊन विजय मिळविण्याचा पालोदकरांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानात विजयी उमेदवाराने किती टक्के मते मिळविली याचा विचार केल्यास १९७१ मध्ये काँग्रेसचे माणिकराव पालोदकर यांनी ७२.९४ टक्के मते मिळवित प्रतिस्पर्ध्यावर प्रचंड मतांनी मात केली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ७२.९४ टक्के मते घेऊन विजय मिळविण्याचा पालोदकरांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे.

लोकसंख्या वाढीनुसार औरंगाबाद मतदारसंख्या वाढत आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदारसंख्या २० लाखांच्या वर गेली आहे. १९७१ मध्ये मात्र औरंगाबाद मतदारसंघात मतदारसंख्या ही केवळ ५ लाख ३० हजार ९२६ इतकी होती. निवडणुकीत २ लाख ६७ हजार २४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान ५२.६२ टक्के झाले. माणिकराव पालोदकर यांनी १ लाख ९४ हजार ९२६ मते मिळविली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी रामभाऊ गावंडे यांना ४७ हजार १५ मते मिळाली.

पालोदकर यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाखालोखाल औरंगाबादचे दोन वेळा खासदार राहिलेले भाऊराव देशमुख यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळविला. १९६२ साली झालेल्या निवडणुकीत ४ लाख ५५ हजार ३४ मतदार होते. निवडणुकीत २ लाख २९ हजार ६६० इतके मतदान झाले. भाऊराव देशमुख यांना १ लाख ४२ हजार मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी बी.एस. मोरे यांना ७३ हजार ८५९ मते मिळाली. देशमुख यांना झालेल्या मतदानाच्या ६५.८२ टक्के मते मिळाली. बापू काळदाते यांनीही १९७७ मध्ये ५६.४७ टक्के मते घेतली होती. स्वामी रामानंदतीर्थ, काझी सलीम, रामकृष्णबाबा पाटील, चंद्रकांत खैरे यांनीही ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळविला आहे.

वर्ष - एकूण मतदान - विजयी उमेदवार - मिळालेली मते(टक्के)१९६२ - २२९६६०- भाऊराव देशमुख - ६५.८२१९७१ - २६७२४० - माणिकराव पालोदकर - ७२.९४१९७७ - ३५६००३ - बापूसाहेब काळदाते- ५६.४७

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४