शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

औरंगाबाद जिल्ह्यातील कॉपीमुक्तीचा विभागाच्या निकालावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:12 IST

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभाग नवव्या स्थानावर राहिला.

ठळक मुद्दे राज्यात सर्वात शेवटी नंबर शिक्षण, विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांचा दावा

- राम शिनगारे 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. विभागातील एकूण पाच जिल्ह्यांतील नापास झालेल्या १९ हजार ३५९ विद्यार्थ्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. बारावी परीक्षेच्या काळात जिल्हाधिकारी, सीईओ आणि माध्यमिक शिक्षण विभागातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्याचा परिणाम विभागाच्या निकालावर झाला आल्याची माहिती शिक्षण आणि विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभाग नवव्या स्थानावर राहिला. याविषयी विभागीय मंडळ, माध्यमिक शिक्षण विभागाशी संवाद साधला असता, विभागांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, परभणी आणि बीड जिल्ह्यांत कॉपी रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता. काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. याचा परिणाम विभागाच्या निकालावर दिसून येत आहे. विभागात एकूण १ लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १९ हजार ३५९ विद्यार्थी नापास झाले आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ३६३ विद्यार्थी नापास झाले आहेत. बीड जिल्ह्यात ४ हजार ३४२, परभणी ३ हजार ५०४, जालना २ हजार ७४३ आणि हिंगोलीतील १४०७ विद्यार्थी नापास झाले. औरंगाबाद जिल्ह्यात ६० हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. याचवेळी कॉपीमुक्त अभियानामुळे अधिक प्रमाणात विद्यार्थी नापास झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२६ विषयांचा १०० टक्के निकालराज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमाला एकूण १५४ विषयांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यातील २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात मल्याळम, पंजाबी, तेलगू, पर्यावरण शिक्षण, ड्रॉइंगसह इतर विषयांचा समावेश आहे. मातृभाषा असलेल्या मराठी विषयाचा निकाल ९७.७३ टक्के एवढा लागला आहे. या विषयाची परीक्षा दिलेल्या राज्यातील ८ लाख ३५ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ९७८ विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी साहित्य या विषयाचा निकाल ९२.८३ टक्के एवढा लागला आहे. 

३९५ कॉपी प्रकरणे परीक्षा काळात उघडकीसऔरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेच्या काळात कॉपीची एकूण ३९५ प्रकरणे उघडकीस आली होती. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील ११३ प्रकरणांची सुनावणी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. उर्वरित प्रकरणांत चौकशी सुरू असल्याची माहिती मंडळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली, तसेच गैरप्रकार झालेल्या १० पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही समजते. 

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाबारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यात येऊ नये, यासाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीपासूनच माध्यमिक शिक्षण विभागाने जनजागृती मोहीम राबवली होती. परीक्षेच्या काळात जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ यांनी प्रत्यक्ष कॉपीमुक्त अभियानात सहभागी होत जिल्ह्यातील महसूल आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली. याचा परिणाम निकालावर झाला असू शकतो. मात्र, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असून, गुणवत्तेशिवाय भविष्य नसल्याचे यातून स्पष्ट झाले. - डॉ. बी.बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा