शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

औरंगाबादेत नवीन मालमत्तांना २५%वाढीव कर लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:18 IST

नवीन मालमत्तांना कर लावताना महापालिका प्रशासन चालू आर्थिक वर्षातील प्रचलित दरांचा अवलंब करीत आहे. यामध्ये २५ टक्केवाढ करून कर आकारणी करण्यात यावी. जुन्या मालमत्ता करात एक रुपयाही वाढ करू नये, अशा आशयाचा ठराव ७ फेबु्रवारीच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. अगोदरच शहरातील ४० टक्के मालमत्तांना कर लावण्यात आलेला नाही. त्यात आणखी वाढीव दराने कर आकारणी करायची म्हटले तर नागरिक नकारघंटा वाजवतील, असा सूर या ठरावाच्या निमित्ताने निघत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्रस्ताव : ७ फेबु्रवारी रोजी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन मालमत्तांना कर लावताना महापालिका प्रशासन चालू आर्थिक वर्षातील प्रचलित दरांचा अवलंब करीत आहे. यामध्ये २५ टक्केवाढ करून कर आकारणी करण्यात यावी. जुन्या मालमत्ता करात एक रुपयाही वाढ करू नये, अशा आशयाचा ठराव ७ फेबु्रवारीच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. अगोदरच शहरातील ४० टक्के मालमत्तांना कर लावण्यात आलेला नाही. त्यात आणखी वाढीव दराने कर आकारणी करायची म्हटले तर नागरिक नकारघंटा वाजवतील, असा सूर या ठरावाच्या निमित्ताने निघत आहे.शहरातील ज्या मालमत्तांना अगोदरच कर लावण्यात आला आहे, त्यात एक रुपयाही वाढ करण्यात आलेली नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात असलेले दर कायम ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात नवीन मालमत्तांना कर आकारताना २५ टक्के दरवाढ सुचविण्यात आलेली आहे. महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या दरानुसार आज एखाद्या घरास कर लावला तर ४ हजार रुपये मालमत्ता कर आकारला जाईल. मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार आणि वाढीव २५ टक्केदरानुसार ५ हजार रुपये मालमत्ता कर होईल. शहरात आजपर्यंत महापालिकेने फक्त १ लाख ९७ हजार मालमत्तांना कर लावला आहे. वास्तविक पाहता शहरात किमान ३ लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. सव्वालाख मालमत्तांना आजपर्यंत महापालिकेने करच लावलेला नाही. मागील काही वर्षांपासून महापालिकेत नवीन मालमत्ता शोधून कर लावा, अशी ओरड अनेकदा झाली. मात्र, प्रशासनाकडून अंमलबजावणीच होत नाही. कर लावण्यासाठी कर्मचारीच नाहीत, असा सूर प्रशासनाकडून अनेकदा व्यक्त झाला आहे. मागील वर्षी मनपा प्रशासनाने मालमत्ता करात सरसकट २५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे वर्ग केला होता. सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.यंदा प्रशासनाने नवीन मालमत्तांना वाढीव दराने कर लावण्याची शिफारस केली आहे. त्यावर ७ फेबु्रवारी रोजी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.